व्हीएस न्यूज – जगदगुरु महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांची जोपासना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जगदगुरु महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
महर्षी वाल्मिकी चौक, अशोकनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, नगरसदस्य शितल ऊर्फ विजय शिंदे, संदिप वाघेरे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, निकीता कदम, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश बैद, माजी नगरसदस्य अरुण टांक, छाया साबळे, अस्पायर नॉलेज ऍण्ड स्कूलचे संस्थापक संजय गांधी, अखिल वाल्मिकी समाज महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष सोनाथ बैद, अखिल वाल्मिकी समाज, पिंपरीचे अध्यक्ष राजु परदेसी, उपाध्यक्ष ग्यानचंद बेद, दिलीप मोटा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दयानंद सोनटक्के उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी शिक्षित झाले पाहिजे. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाच्या माध्यमातुन समाज जागृती केली. समाजाच्या उन्नतीसाठी महापालिकेच्या वतीने सर्वोतोपरीने मदत केली जाईल, असे ही ते म्हणाले.
यावेळी कवीराज संघेलिया, गणेश क्षिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार महापौर नितीन काळजे व महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश बैद यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक राजेश बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी तर आभार किशोर केदारी यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002