व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ०१ जुलै २०२५ : "ब" प्रभाग कार्यालयांतर्गत येणारी लायसन धारक टपरी उचलून अतिक्रमण विभागाने चुकीची कारवाई केली. बंद असलेल्या टपऱ्या उचलून तेही अधिकृत लायसन असलेल्यावर कारवाई करून गोर गरीब लोकाची रोजी रोटी हिसकावून घेण्याचे काम महापालिकेचा संबंधित विभाग करीत असून केवळ पैसे लुटण्याचे काम चालू आहे. सदर चुकीच्या कारवाई विरोधात भाजपा महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या आरपीआय आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "अतिक्रमण विभागामुळे त्यांच्या भ्रष्ट कारवाईमुळे जाणून-बुजून द्वेषा पोटी केलेल्या कारवाईमुळे धनदांडग्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या कारवाईमुळे माझी जगण्याची आशा संपली आहे, कारण माझी रोजी रोटी ज्या धंद्यावरती अवलंबून होती ती टपरी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून उचलून घेऊन गेले. या आंदोलनामधून चुकीच्या कारवाईतून ओढलेली परिस्थिती माझ्या परिवाराला महानगरपालिकेसारख्या शहरांमध्ये हलाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे खचलेला एक नागरिक त्याची झालेली अवस्था ही आंदोलनाद्वारे शहरांमध्ये महानगरपालिकेला दाखवत आहे. खरंच जनसामान्यांवर मरणाची वेळ आलेली आहे. पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी यांना आपल्या कायद्याची जाण नाही. कोर्टाची जाण नाही, कारण दिनांक 28 मार्च 2025 रोजी पासून मी महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष फोन द्वारे किंवा पत्रव्यवहाराद्वारे न्याय मागत आहे ,परंतु मला न्याय न भेटता उडवा उडवीचे उत्तरे दिली गेली. माझ्याकडे महापालिकेचे लायसन्स असून सुद्धा हातगाडी उचलून नेली असून मी माझ्या टपरी वरती दोन्ही प्रति लावल्या होत्या, तरीसुद्धा ब प्रभाग अतिक्रमण विभागाने माझ्या रोजी रोटीवर अतिक्रमण व बळाचा वापर करून माझ्यावर कारवाई केली. ही कारवाई चुकीची असल्यामुळे मी माझ्या आणि माझ्या कुटुंबावर मरणाची वेळ आली असल्यामुळे मी या अतिरिक्त उपायुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची तिरडी उठाव आंदोलन करुन निषेध करतो व्यक्त करीत आहे" मला न्याय मिळावा जनसामान्यांना सुद्धा महानगरपालिकेमध्ये न्याय मिळावा , असे दत्तात्रय गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002