व्हीएस न्यूज - अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये गेल्या महिन्याभरापासून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. याबाबत फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन दखल घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे शुक्रवारी (दि.10) हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास फ-प्रभाग कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग अध्यक्षा गंगा धेंडे, कविता खराडे, पुष्पा शेळके, रेश्मा पठाण, पल्लवी साखळे, शिला भोंडवे, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, दिपाली देशमुख, रेश्मा पठाण, संजय धेंडे, नवनाथ कांबळे, शिरीष आवाळे, दत्ता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गंगा धेंडे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चो काढून फ क्षेत्रीय कार्यालय कामकाजाचा निषेध करण्यात आला. यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये पाणी पुरवठा अनेक महिन्यांपासून सुरळीत होत नाही, तेथील रहिवासी कुंटूंबाची पाण्यावाचून वणवण सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही वारंवार होणारे दुर्लक्षामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चो काढून निषेध केला आहे. तसेच दोन दिवसात पाणी पुरवठा सुरु न केल्यास प्रभागाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002