व्हीएस न्यूज – देशात 500 व 1000 रुपये चलनात बंद केल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ठिकठिकाणी मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना देहूरोड येथे रविवारी (दि. 19) सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देहूरोड मेन बाजार पेठेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात रविवारी सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने नोटबंदी काळात मृत झालेल्या नागरीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे, मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, ऍड. बालाजी गायकवाड, वैशाली अवघडे, अवघडे, विजय मोरे, पंकज तंतरपाळे, किरण कांबळे, मेजराज तंतरपाळे, रमेश पवार, मेनु शेख, पत्रकार उमेश ओव्हाळ, रामकुमार आगरवाल, देवराम भेगडे, संजय धुतडमल आदी यावेळी उपस्थित होते.
देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात सुरू असलेले 500 व 1000 रुपयाच्या नोटा सरकारने बंद केले. जुन्या बंद केलेल्या नोटा बॅंकेत जमा करण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत नागरिकांना देण्यात आली. तारांबळ उडालेल्या गरीब नागरीकांनी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान बॅंकेत रक्कम भरणा करताना, काढताना लावलेल्या रांगेत, पैशांच्या अभावामुळे, भुकेमुळे, दवाखान्यात, रुग्णालयाच्या उपचारापोटी, ताण-तणाव अशा वेगवेगळ्या कारणाने देशभरात ठिक-ठिकाणी सुमारे 125 हून अधिक नागरीक मृत्युमुखी पडले. या नागरिकांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उपस्थितांनी मेणबत्ती पेटवून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002