व्हीएस न्यूज - देशात ओबीसी व बलुतेदारांची संख्या मोठी आहे. त्यांनी संघटीत लढा उभा करावा. त्यांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार न्यायाची भूमिका घेत आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी केले.
विविध मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या शिष्टमंडळाने खासदार साबळे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. मागण्यांचे निवेदन संघाचे अध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी दिले. यावेळी संघाचे सचिन राजेंद्र पंडित, प्रदेश निरीक्षक प्रदीप वाळुंजकर, शहराध्यक्ष नागेश भोपुलकर, संपर्कप्रमुख विशाल वाळुंजकर, सरला कानमपल्लीवार, अशोक पंडित, संतोष शिंदे, चेतन भालेराव, संदीप राऊत, गणेश वाळुंजकर, अनंत कानडे, नितीन कुटे आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने बलुतेदारांना स्वतंत्र बजेट द्यावे, त्यांची जनगणना जाहीर करावी, क्रिमिलेअर मधून बलुतेदारांना बगळावे, बलुतेदारांसाठी व्यावसायिक, शैक्षणिक, प्रगतीचे धोरण ठरवावे, बलुतेदारांना सर्वत्र प्रतिनिधीत्व द्यावे,तसेच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न व राष्ट्रसंत सेना व नामदेव महाराज यांच्यासह भाई कोतवाल यांचे टपाल तिकीट सुरू करावेत, आदी मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार साबळे यांनी शिष्टमंडळाला दिले. सूत्रसंचालन विशाल वाळुंजकर यांनी केले. आभार नागेश भोपुलकर यांनी मानले. निवेदन सचिव राजेंद्र पंडित यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002