व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड प्रभाग क्र. 10 येथील इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या इमारतींची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येथिल नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्या इमारतींचे जिने तुटलेले असून, पावसाळ्यात टेरेस-भिंतींमधून पाणी झिरपत असते, इमारतींमधील शौचालयांचे पाईप्स तुटल्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे कचरा जमा करण्यासाठी पालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या घंटागाड्यांपैकी एकही घंटागाडी याठिकाणी आत्तापर्यंत आलेली नाही. त्यामुळे सोसायट्यांच्या सभोवती कचऱ्यांचे ढिग लागले आहेत. परिणामी रोगराई पसरत आहे. येथील शौचालयांचे ड्रेनज वारंवार जाम होउन मैला बाहेर येत असतो, त्यामुळे परिसरात दुर्गधी पसरुन लोकांना त्याचा त्रास होत आहे. म्हणून ड्रेनेज लाईन्स नविन टाकण्यात याव्यात, अशी विविध समस्या इंदिरानगर प्रकल्पात असून तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी बच्छाव यांनी केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002