व्हीएस न्यूज - पंख संस्था आणि क्विकहील फाऊंडेशन व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय येथे शाळांगण प्रकल्पा अंतर्गत मुलांना मुलांसाठी जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत आणि पवन पाटील उपस्थित होते. त्यांच्याबरोबर पंख संस्थेच्या अध्यक्षा स्मिता आपटे,क्विकहील फाऊंडेशनचे सीएसआर प्रमुख अजय शिर्के, पंखच्या विश्वस्त सीमा ननवरे व नवमहाराष्ट्र विद्यालय (मुलांची)चे मुख्याध्यापक उत्तमराव पाटील आणि नवमहाराष्ट्र विद्यालय (मुलींची)च्या मुख्याध्यापिका शारदा जाधव उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत आणि पवन पाटील यांनी मुलांना छेडछाड, विनयभंग यासंबधीचे कायद्यांबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच भारतातील मुली सक्षम असून त्यांनी याप्रकरणी कशी पावले उचलली पाहिजेत यासंदर्भात मुलींना आणि छेडछाड, रॅगिंग, विनयभंग अशा गोष्टी केल्यास कोणते गुन्हे दाखल होऊन कशी शिक्षा होऊ शकते व कोणत्या मित्रांपासून लांब राहणे योग्य आहे. यासंदर्भात योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002