व्हीएस न्यूज – ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक निवडून आले नाहीत. तेथील जनतेला त्रास देण्याचे षडयंत्र सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रचले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तेथील नागरिकांना नियोजनपूर्वक पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
यासंदर्भात भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन समान पाणी वितरणाची मागणी केली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, आकुर्डी दत्तवाडी विठ्ठलवाडी तुळजाईवस्ती महात्मा फुलेनगर आदी भागात महापालिका निवडणुकीपूर्वी पाणी पुरवठा सुरळीत होत होता. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या संकुचित राजकारणातून ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक निवडून आले नाहीत. त्या प्रभागात जाणीवपूर्वक सुडबुद्धीने पाणी पुरवठा कमी दाबाने केला जात आहे. यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रशासनावर दबाव टाकत आहेत.
मोहननगर व आकुर्डी परिसरात गेल्या चार-पाच महिन्यापासून कमी दाबाने व विस्कळीत पाणी पुरवठा होतो. या गंभीर तक्रारीबाबत आठ ते दहा वेळा स्थानिक नगरसेविकांनी लेखी तक्रार केली आहे. तरीही, या प्रश्नाचे निराकरण झाले नाही. याविरोधात स्थानिक नगरसेवकांसह प्रभागातील महिलांनी आंदोलन देखील केले. मात्र, पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महापालिका आयुक्तांनी नागरिकांना राजकीय पदाधिकाऱ्यांकडून जाणुनबुजून दिला जाणारा त्रास थांबवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा मारुती भापकर यांनी दिला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002