व्हीएस न्युज - कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका आयटी अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१५) मध्यरात्री पिंपरीतील डीलक्स चौकात घडली. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. मंजित प्रसाद असे खून केलेल्या आयटी अभियंत्याचे नांव आहे.
मंजित पुण्यातील डब्लूएनएस कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजित प्रसाद हे विमाननगर येथील आयटीपार्क मध्ये संगणक अभियंता म्हणून काम करतात.
ते कॅब (बस) ने काळवाडीच्या दिशेने जात होते. बस मध्ये अनेक ऍम्प्लॉईज होते. पिंपरीच्या डीलक्स चौकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवला त्यांनी बस थांबविण्यास बस चालकाला सांगितले. बस चालका शेजारी मंजित बसले होते. त्यांनी काय झाले असे गुंडांना विचारले असता त्यातील एका आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली. याचाच जाब विचारण्यासाठी मंजित बसच्या खाली उतरले. तेव्हा मंजित यांना पाच जणांनी लथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्यातील काहींनी धारदार शस्त्रांनी पोटावर आणि छातीवर वार केले यात मंजित गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला.
मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेण्याऱ्या ताकतोडे यांच्या शोकसभेप्रसंगी सरकारचा जाहीर निषेध
व्हिएस न्युज - मातंग समाजाला लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील तरुण कै संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन प्राणत्याग केला या निषेधार्थ शहरातील मातंग समाजाच्या वतीने पिंपरी येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर संतप्त आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस व आंदोलकात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्यात असे म्हणले आहे की, अनेक वर्षापासुन मातंग समाजावर अन्याय होत असुन शासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही मातंग समाजाचे लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार आरक्षण मिळत नसल्यामुळे संजय ताकतोडे या युवकाने आत्महत्या केली आहे, याची राज्यभर आक्रमक निदर्शने व आंदोलने होत आहेत, सरकारने आरक्षणाबाबत सकारात्मक पावले उचलावीत व टाकतोडेंच्या कुटूंबियांना ५० लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यात केली आहे.
निषेध सभा झाल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेत मानवी साखळीद्वारे रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पिंपरी पोलीस व आंदोलकात बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले, आंदोलकांची आक्रमकता पाहुन पोलिसांनी नमती बाजु घेतली व ताब्यात घेतलेल्यांना सोडून दिले त्यामुळे वातावरण शांत झाले.
यावेळी जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड, संजय धुतडमल, शिवसेनेचे युवराज दाखले, धनंजय भिसे, दत्तु चव्हाण, नितीन घोलप, शिवाजी साळवे, भिमा वाघमारे, संजय ससाणे, विशाल कसबे, आशा शहाणे, महेश खिलारे, अनिल सौंदडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्युज - मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात अ, ब, क, ड, वर्गीकरण व प्रलंबीत मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करू नये. अन्यथा महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार टकला जाईल, असा इशारा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा लहुजी शक्तीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी सरकारला दिला आहे.
दाखले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या मजकुरात म्हटले आहे की, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीडमधील केज तालुक्यातील एका तरुणाने पाली धरणात उडी मारून जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिसांना काठावर एक बॅग सापडली असून त्यात मोबाईलमध्ये त्याने आत्महत्येचे कारण रेकॉर्ड केले आहे. संजय ज्ञानोबा ताकतोडे असे त्या तरुणाचे नाव आहे.
मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे मातंग समाजाकडून काढण्यात आली. परंतु, गेंड्याची कातडी आसलेल्या पूर्वीच्या सरकारप्रमाणे हे राज्यसरकार कामकाज करत आसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसरकारने गांभीर्याने दखल न घेतल्याने मातंग समाजाच्या युवकाला आरक्षणासाठी आपले प्राण गमवावे लागले.
राज्यसरकारने संजय ताकसांडेच्या कुटूंबाची जबाबदारी स्विकारून आरक्षणासाठी तात्काळ सकारात्मक भुमीका घ्यावी, अन्यथा मातंग समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा दाखले यांनी दिला आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यपद मिळावे यासाठी कोअर कमिटी मध्ये ठरल्याप्रमाणे स्थायी समिती सदस्य पद एक वर्षासाठी देण्याचे ठरले. त्यामुळे मागील वर्षी मी व आताचे महापौर राहूल जाधव यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. राहूल जाधव यांना महापौर पद देण्यात आले. यावर्षी मला स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे म्हणून मला सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि कोअर कमिटीने ‘हिरवा कंदील’ दिला होता. परंतू शेवटच्या क्षणी काय झाले या बाबत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी (दि. 7 मार्च) आहे. तो पर्यंत माझेच नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेते व कोअर कमिटी निश्चित करेल असा आशावाद भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शितल शिंदे यांनी सोमवारी (दि. 4 मार्च) पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.
स्थायी समिती सदस्य पद फक्त एकच वर्षासाठी द्यायचे असे ठरले असतानाही मागील वर्षी स्थायी समितीत असणारे नगरसेवक विलास मडेगिरी यांचे नाव पुन्हा कसे काय आले? कदाचित कोअर कमिटी कडून हि चूक झाली असेल, हि चूक ते गुरुवार पर्यंत दुरुस्त करतील व माझेच नाव अध्यक्षपदासाठी घेतील असाही विश्वास शितल शिंदे यांनी व्यक्त केला. जर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नवीन सदस्याचे नाव घेतले असते तरी मी मान्य केले असते. परंतू मडेगिरी यांच्यासाठी ठरलेले धोरण का बदलण्यात आले? याबाबत मी वरिष्ठ नेत्यांकडे माझी कैफियत मांडली आहे. भाजपा हा पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे माझ्यावरील अन्याय निश्चित होईल. असेही शितल शिंदे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून कर्जदाराला चौघांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आळंदी येथे घडली असून याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मारुती धुराजी ढगे (वय 49, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अवधूत जालिंदर गाढवे (वय-27 रा. मोशी) व बाबू (पूर्णनाव माहिती नाही) व याचे दोन साथीदार अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अवधूतला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती यांनी मुलीच्या बाळंतपणासाठी अवधूतकडून 50 हजार रुपये हे 20 टक्के व्याजाने घेतले होते.
हा व्याजदर जास्त असल्यामुळे मारुती यांनी नातेवाईकांकडून पैसे गोळा केले व मुद्दल व एक महिना व्याजाचे 10 हजार असे एकूण 60 हजार रुपये अवधुत याला परत केले. ही रक्कम घेऊनही अवधुत याने मारुती यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्ती दुचाकीवर बसवून आळंदी येथे नेऊन त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये काढून घेतले व त्यांना मोहिनी लॉज येथे डांबून ठेवले. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
दिघी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज – ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान का केले नाही, असे विचारत आणि त्याचा राग मनात ठेवून चौघांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड येथे घडला.
मीरा बाळासाहेब रौंधळ, बाळासाहेब रौंधळ, स्वप्नील रौंधळ, महेंद्र रौंधळ (सर्व रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपाली सोमनाथ रौंधळ (वय 30 रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला मतदान का केले नाही ? त्यामुळे आमचा उमेदवार पडला असे म्हणत, त्याचा राग मनात धरुन मीरा यांनी दीपाली यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर, तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनीच पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी बारणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे मुख्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच अडकली. त्याचा फटका महापौर राहुल जाधव यांनाही बसला. महापौर गाडी सोडून चालत मुख्यालयात दाखल झाले.
पत्रकारांशी बोलताना बारणे म्हणाल्या,की शहरात बांधकाम व्यावसायिक बेकायदा बांधकामे करत आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयुक्त तसेच पक्षनेत्यांचे पालिकेच्या कारभारावर कसलेही नियंत्रण राहिले नाही. काही ठिकाणी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांचे संगनमत आहे. पूर्णत्वाचा दाखला घेतलाच जात नाही.
थेरगावात १२ मीटर रस्त्याचे काम नियमबाह्य़ पद्धतीने केले जात आहे. सामान्यांना नियम सांगितले जातात. धनदांडग्यांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात आहे, असा आरोप बारणे यांनी केला.
व्हीएस न्युज - पश्चिम महाराष्ट्र भव्य राज्यस्तरिय शरीरसौष्ठव ‘खासदार श्री २०१९’ चा मानकरी पिंपरी चिंचवडचा रूपेश चव्हाण ठरला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे हजारो क्रीडा प्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धी पार पडली. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाण याने खासदार श्री-२०१९ हा किताब पटकावला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बेस्ट पोजर अतुल साळुंखे (पुणे), मोस्ट इंप्रूड राजेंद्र जाधव (कोल्हापूर), अपकमिंग बॉडी बिल्डर तुषार चोरगे (पिंपरी चिंचवड) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी स्पर्धेचे आयोजन केले.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे राजेश सावंत, प्रणव मुजुमदार, विजय मोरे, संजय महाडिक यांनी पंच म्हणून काम पहिले. विभागप्रमुख राजेश वाबळे, भोलाराम पाटील, रवींद्र ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्क नेते बाळाभाई कदम, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, पुणे जिल्हा संघटिका उर्मिलाताई काळभोर, उपशहरप्रमुख रोमी संधू,तुषार नवले, माजी नगरसेवक किरण मोटे, संतोष सौंदणकर, उद्योजक संतोष बारणे, निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हीएस न्युज - जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला यश आले आहे. विमान कोसळत असताना पॅराशूट देखील दिसले. मात्र, विमानातील पाकिस्तानी वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेले नाही. या कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका दिला आहे.
मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे.
नौशेरा भागात विमान कोसळले असून विमान कोसळत असताना एक पॅराशूटही दिसले. विमानातील वैमानिकाने पॅराशूटद्वारे उडी मारली असावी, अशी शक्यता आहे. मात्र, वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
व्हीएस न्युज - कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली आहे. नाशिक पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली असून लवकरच ते पदभार स्विकारणार आहेत. नाशिक पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.रवींद्र सिंघल यांच्या नियुक्तीबद्दल मात्र अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही.
रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील दोघेही धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. अनेक तरुण दोघांना आपला आदर्श मानतात. स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. मूळचे सांगली जिल्ह्याचे असणारे विश्वास नांगरे पाटील यांनी खडतर प्रवास करत यश मिळवलं आहे. याचा अनेकदा त्यांनी आपल्या भाषणातही उल्लेख केला आहे. स्पर्धा परिक्षेसाठी अनेक तरुणांना ते मदतदेखील करतात.
दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षकपदी असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द –
व्हीएस न्युज - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी, राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा संरक्षण कायदा करावा, अशा विविध मागण्यांसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (ईसा) येत्या सोमवारी (२५ फेब्रुवारी) राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा बंदमध्ये राज्यातील सुमारे अडीच हजार शाळा सहभागी होणार आहेत.
ईसाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहसचिव ओम शर्मा, विनय जोशी आदी या वेळी उपस्थित होते. १ नोव्हेंबर २०१८चा शासन निर्णय रद्द करावा, १८ नोव्हेंबर २०१३च्या शासन निर्णयात सुधारणा करावी, शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी मुख्याध्यापकांऐवजी शालेय वाहतूक व्यवस्थापकावर सोपवावी, मोफत गणवेश, पुस्तके, पिशवी आणि अन्य साहित्य उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, स्वयं अर्थसाहाय्यित शाळांचा दर्जा वाढ होण्यासाठी तातडीने ऑनलाइन प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. ‘राज्यातील खासगी इंग्रजी शाळांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारकडून ठोस कारवाई न करता केवळ तात्पुरते उपाय केले जातात. त्यामुळे या शाळांच्या इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने येत्या २५ फेब्रुवारीला राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जिल्ह्य़ांतील शाळा, ७ संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे,’ असे सिंग यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - बुधवारी(दि.२०) झालेल्या मंदिर दुर्घटने प्रकरणी ठेकेदारास सांगवी पोलिसांनी अटक केली असून जेरबंद केलं आहे.राहुल जयप्रकाश जगताप असं ठेकेदाराचे नाव आहे. त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग यांनी सदरचे मंदिर हे अनधिकृत असल्याने नोटीस बजावली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम सुरू ठेवले होते. तेव्हा सभामंडप कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत.
सविस्तर माहीती अशी की, बुधवारी दुपारी पाऊणे चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे नदी काठेवर महादेव मंदिराच्या बांधकाम जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. काही मजूर हे मंदिरात दगड आणून टाकत होते तर काही जण सभामंडपाला आधार दिलेले लोखंडी रॉड आणि लाकडी बांबू काढून घेण्याचे काम करत होते. त्याच वेळी अचानक सभामंडम मजुरांच्या अंगावर कोसळला यात १२ कामगार अडकले होते. त्यातील तीन मजुरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, यात एका महिलेचा समावेश होता. तर ऐकूण नऊ मजूर जखमी झाले होते.
याप्रकरणी ठेकेदार राहुल जयप्रकाश जगताप याच्यावर मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कामगारांना हेल्मेट,सेफ्टी शूज,सेफ्टी जाळी दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे जगताप याला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अधिक तपास सांगवीचे पोलीस उपनिरीक्षक निकुंभ हे करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002