व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर्मचारी असलेले बनावट ओळखपत्र तयार करुन महापालिका भवनात सरासपणे वावरणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ करण्यात आली. संदेश रामचंद्र जाधव असे अटक करण्यात आलेल्या या तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी सुरक्षा विभागप्रमुख उदय जरांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मजूर म्हणून असलेले ओळखपत्र घालून सरासपणे महापालिका भवनात वावरत होता. बुधवारी तो महापालिका भवनात प्रवेश करणार होता. इतक्या तेथील सुरक्षारक्षकांना त्याचा सशंय आला. त्यांनी त्याची चौकशी करुन ओळखपत्र पाहिले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. तसेच तो पालिकेत कोणत्याही विभागात कामास नसल्याचे आढळून आले. यावर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन पिंपरी पोलिसाच्या हवाली केले.
दरम्यान सहा महिन्यांपूर्वी देखील संदेश याने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून प्रवेश केला होता. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून देण्यात आले होते. त्याने चिंचवड येथील एका व्यक्तीकडून पालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचे कबूल केले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - पुण्यातील मंचर येथे २०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुटका करण्यात आली आहे. तब्बल १५ तासांनी मुलाला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. सकाळी एनडीआरएफचं पथक मुलापर्यंत पोहोचलं होतं. पण कमरेचा भाग अडकला असल्या कारणाने त्याला बाहेर काढण्यात अडचण येत होती. पण अखेर मुलगा सुखरुप बाहेर पडला आहे.
रवी पंडित असं या मुलाचं नाव आहे. खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला होता. या परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरु असून अनेक कामगार या कामात सहभागी आहेत. रवीचे आई-वडिलही बांधकाम मजूर असल्याने तोही आई-वडिलांसोबत याठिकाणी होता. बोअरवेलवर कोणतेही झाकण नसल्याने खेळता-खेळता ६ वर्षांचा रवी थेट बोअरवेलमध्ये पडला होता. बुधवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.
सुरुवातीला तो केवळ १० फुटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. नंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले होते. अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. पण अखेर १५ तासांनी रवीला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आलं आहे. संबंधित घटनेत जे कोणी दोषी असतील किंवा आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली आहे.
व्हीएस न्युज - अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या कऱण्यात आल्या आहेत. या बाबतचा आदेश सोमवारी (दि.१९) काढण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या निवडणुकां दरम्यान पोलिसांच्या बदल्या होणे हे रुटींग आहे. निवडुकी दरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नियोजन करुन पोलिसांच्या बदल्या योग्य ठिकाणी करण्यात येतात.
यादरम्यान बऱ्याचदा राजकीय नेते हस्ताक्षेप करुन आपल्या सोईनुसार पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन घेतात. तर काही पोलीस एकाच ठिकाणी बसतान मांडून असतात. यामुळे कोणत्याही निवडुकी पूर्वी पोलिसांच्या बदल्या केल्या जातात. दरम्यान काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालयात या आगोदरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने काही पोलीस कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. तर काहींनी खाजगीमध्ये निराशा व्यक्त केली आहे.
बदली झालेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक भानुदास जाधव (वपोनि तळेगाव दाभाडे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२), सुधाकर काटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे), अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी ते पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा), राजेंद्र पांडूरंग कुंटे (वपोनि भोसरी एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष संलग्न), भीमराव एन. शिंगाडे (पोलीस निरीक्षक विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी अतिरिक्त कार्यभार), विवेक व्ही. मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली ते पोलीस निरीक्षक सायबर सेल), श्रीराम बळीराम पोळ (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली अतिरिक्त पदभार), शंकर वामनराव अवताडे (पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड), सतिश पवार (पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी), आर.पी. चौधर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ते पोलीस नियंत्रण कक्ष संलग्न), उमेश औदुंबर तावसकर (पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा ते वाहतुक नियंत्रण कक्ष), सतिश विठ्ठलराव नादुरकर (पोलीस निरीक्षक गुन्हे भोसरी एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार) यांचा समावेश असून १३ सहायक पोलीस निरीक्षक तर ५० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
व्हिएस न्युज - महाविद्यालयात झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीन जणांच्या टोळक्यांनी चिखली येथे जावून पाच जणांना लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेमध्ये एक महिला देखील जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री जाधववाडी, चिखली येथे घडली. या प्रकरणी योगेश संतोष इंगळे (वय १९ रा. जाधववाडी चिखली) या तरुणाने चिखली पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश संतोष इंगळे व इतर चौघे आशा पाच जणाना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुभम ईश्वर तायडे (वय १९), शुभम देवानंद प्रधान (वय २२), महेश बाळू लगाडे (वय २२), जाधववाडी, चिखली) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी आणि आरोपी यांचे पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी चिखली येथे जाऊन पाच जणांना लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली. तसेच धमकी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे करीत आहेत.
व्हिएस न्युज - मोहसीन शेख या तरुणाच्या हत्याला पाच वर्ष पूर्ण होत असून मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारउ असून विविध मागण्या साठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून तरुणांनी एकत्र येत जवळपास १७३ ठिकाणाहून राज्यपाल व मुख्यमंत्री यांना तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यात २ जून २०१४ मोहसीन शेख या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या गेल्या होत्या कुठून टाकल्या होत्या,कोणी टाकल्या होत्या पत्ता लागायच्या आत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मोहसीन शेख चा त्यात बळी घेतला गेला. मोहसीन च्या हत्येला आक्षेपार्ह पोस्टचा आधार घेतला गेला मात्र त्या पोस्ट चा आणि त्याचा काडीचा सुद्धा संबंध नव्हता. हत्या करायला कारण मात्र फक्त चेहऱ्यावरील दाढी आणि डोक्यावरील टोपी होती.
कट्टरवाद्यांनी नाहक एका निरपराधाचा जीव घेतला होता. न्यायाच्या प्रतीक्षेत मोहसीन चे वडील सादिक शेख यांचा मृत्यू झाला. आई शबाना परवीन ह्या आजारपणामुळे अंथुरनाला खिळून आहेत. मोहसीन चा छोटा भाऊ मुबीन वर सगळी जबादारी येऊन पडली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा केला गेला असून त्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
मोहसीन शेख यांच्या हत्येला येत्या २ जून २०१९ ला मोहसीन च्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होतील. मोहसीन शेख हत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई सह १७३ ठिकाणाहून निवेदन सादर केले गेले. अशी माहिती जस्टिस फॉर मोहसीन मुव्हमेंटचे आयोजक सदस्य इम्रान शेख, इरफान शेख सुफियान मणियार, जुनेद आत्तार, अख्तर शेख यांनी दिली.
व्हीएस न्युज - शिवणे येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट यांचे त्यांच्या ओळखीच्या मित्रांनीच अपहरण केले असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले आहे. विनायक शिरसाट व त्याचे वडिल सुधाकर हे शिवणे, उत्तमनगर या परिसरातील बेकायदा बांधकामांविषयी पीएमआरडीकडे तक्रार करीत होते. त्यातून काही ठिकाणी पीएमआरडीने कारवाई केली होती. त्यामुळे विनायक शिरसाट यांचे याच कारणावरुन अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, त्यांच्या हत्येमागे माहिती अधिकारच्या कारणापेक्षा वेगळेच कारण पुढे येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अशी माहिती पुढे आली आहे.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
विनायक शिरसाट हे ३० जानेवारीला घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या ओळखीचे ३ मित्र होते. ते घरी परत न आल्याने त्यांची पजेरो गाडी नऱ्हे येथे सोडून दिल्याचे आढळून आले. त्यामुळे अगोदर बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन ते परत न आल्याने ५ फेब्रुवारी रोजी अपहरणाची फिर्याद नोंदविण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विनायक शिरसाट हे घरातून निघाल्यानंतर ते मित्रांबरोबर नऱ्हे येथे आले व तेथे त्यांच्या गाडीतून त्याचे अपहरण करुन दुसऱ्या गाडीने त्यांना पिरंगुट लवासा रोडला नेण्यात आले. त्यानंतर मुठा गावाजवळ त्यांचा खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत टाकून देण्यात आला असे पोलीसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तपास करीत असताना त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले.
गेल्या काही दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस त्यांचा शोध घेत होते. पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत सोमवारी दुपारी एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्यांच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचे ओळखले.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्ष सत्ता होती. त्या सत्तेच्या कार्यकाळात शहरात झालेली विकास कामे पाहण्यासाठी आज (दि.११) दिवसभर मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी फेरफटका मारला. शहराला पाणी पुरवठा करणारे निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र, दुर्गादेवी टेकडी यासह विविध ठिकाणी भेटी देवून शहराची पाहणी केली. त्याच शिवाय संत तुकाराम नगरमधील एका टपरीवर थांबून चहा आस्वाद घेत त्यांनी तेथील गावाहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शहराची माहिती जाणून घेत संवादही साधला. त्याच्यासमेवत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारर्किदीची मुहूर्तमेढ पिंपरी चिंचवडमध्ये रोवली गेली होती. त्यांना पिंपरी चिंचवडकरांनी १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर त्यांनी मागे फिरुन पाहिलेच नाही. त्यांची लोकप्रियता आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला दांडगा जनसंर्पकामुळे पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी म्हणून ते काम पाहू लागले. सलग पंधरा वर्ष महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता त्यांनी अबाधित ठेवली. त्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला. शहरातील सुसज्ज रस्ते, उड्डाणपुल, पाणी पुरवठा योजना, उद्याने, क्रीडागंणाची आदी विकास कामे त्यांनी केली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यात शहराचे पुर्वाश्रमीचे कारभारी अजित पवारांचा मोलाचा हात आहे.
दरम्यान, सध्या मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटा-तटात विभागला आहे. मावळात राष्ट्रवादीची ताकद असूनही शिवसेनेचाच खासदार निवडून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील गट-तट एकत्रित करण्यासाठी राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवारांचे नाव जोरदार चर्चेले जात आहे. त्यातच पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेवून मतदार संघात जनसंपर्क वाढवू लागले आहेत.
पार्थ पवारांच्या राजकीय कारर्किदीची मुहूतमेढ मावळातून रोवली जात आहे. त्यासाठी जोरदार मोर्चबांधणी सुरु आहे. त्यामुळे वडील अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात केलेली विकास कामे आणि शहराची अंर्तगत ओळख व्हावी म्हणून पार्थ पवार हे शहरात फेरफटका मारु लागले आहेत. त्यांनी सोमवारी (दि.११) शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली. पिंपरीतील डी.वाय.पाटील अंभियांत्रिकी महाविद्यालयाशेजारी चहाचा अस्वाद घेवून तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधला. शहराची माहिती त्यांच्याकडून जाणून घेत विकास कामांबाबत माहिती त्यांनी विचारली. त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांची मनमोकळे पणाने संवाद साधला. त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे मावळमधून पार्थ पवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
व्हीएस न्युज - जातीचे नाव काढणाऱ्याला मी ठोकून काढेन, आमच्या पाच जिल्ह्यात जात काढली जात नाही. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमच्या वतीने पारधी समाजातील तरूणांना गायींचे वाटप गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अनिल शिरोळे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, गिरीश प्रभुणे, माजी खासदार प्रदीप रावत, माधव भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, सोशितांची, पीडितांची निरंतर सेवा करून ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा, मकान मिळेल, त्या दिवशी आपले कार्य पूर्ण होईल, असा संदेश पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सामाजिक, आर्थिक आत्मचिंतनात दिलेला आहे. त्यामुळे मी जात पात मानत नाही,येथे किती पाळतात हे मला माहीत नाही. मात्र, आमच्या येथे बंद केली आहे. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. या समाजात गरीब श्रीमंत असा भेद असता कामा नये. कोणालाही छोट्या आणि मोठ्या जातीचा न म्हणता एकात्म आणि अखंड असा समाज तयार व्हावा, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.
व्हीएस न्युज - विक्रि करण्यासाठी आलेल्या ५ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ६७ मोबाईलसह दोघांना अटक तर एका अल्पवयीन आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नाशिकफाटा येथे करण्यात आली.
अमिन सज्जाद इनामदार (व २५, रा. आदर्शनगर, मोशी) आणि शेखर संभाजी जाधव (वय १९, रा. दिघीरोड, स्वययंभु गणेश मंदिराजवळ, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून एक अल्पवयीन आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे भोसरी पोलीस ठाणे परिसरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती कि, नाशिकफाटा परिसरात एकजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अमिन याला तर शेखर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला भोसरी ओव्हर ब्रीज खालून ताब्यात घेतले.
या तिघांची कसून चौकशी केली असता अमिन याने १३ मोबाईल हे भोसरी परिसरातून चालत बोलत जाणाऱ्याचे चोरले, शेखर याने ४१ मोबाईल उघड्या दरवाजा आणि खिडकी वाटे चोरल्याचे सांगितले. तर अल्पवयीन आरोपीकडून १३ मोबाईल हस्त करण्यात आले. गुन्हे शाखेने असे एकूण ५ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ६७ मोबाईल या तिघांकडून जप्त केले. यातील अमिन आणि शेखर हे सराईत मोबाईल चोर असून त्यांना यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती.
दरम्यान भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि परिसरातून ज्या कुणाचे मोबाईल चोरीला गेली असतील त्यांनी गुन्हे शाखा युनिट १, मोहननगर, चिंचवड येथील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील (मो. क्र. ९७०२९९९४६७) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्युज - पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप असा एकूण २ लाख ४० हजारांच्या ऐवजासह पिंपरी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई चिंचवड मोहननगर परिसरातील मिल्कमेड कंपनीसमोर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिसांचे एक पथक रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांचा तपास घेण्यासाठी चिंचवड मोहननगर परिसरातील मिल्कमेड कंपनीसमोर गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका दुचाकीवर दोन अल्पवयीन तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप असा एकूण २ लाख ४० हजारांच्या ऐवज चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी तो ऐवज जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, महादेव जावळे, श्रीकांत जाधव, अजिनाथ सरक, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, अविनाश देशमुख, उमेश वानखडे, रोहित पिंजरकर यांच्या पथकाने केली.
व्हिएस न्युज - पुण्यात अतिरिक्त आयुक्त असलेल्या राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांसमोरच बेदम मारहाण करण्यात आली. नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात हे कृत्य करण्यात आले. जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना ही घटना घडली. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या.
महापालिकेमध्ये दुपारच्या सुमारास अशाप्रकारची घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जलपर्णी गैरव्यवहारात भाजपाचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापौर दालनात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान ‘दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकानी महापौरकडे केली. ज्यांनी निविदा काढल्या त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत अशा घोषणाही कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर त्याठिकाणी उपस्थित होते.
व्हिएस न्युज - स्वच्छता न ठेवून आणि विना परवाना अन्नपदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील कॅम्प भागातील गार्डन वडापाव सेंटर, अख्तर केटरर्स आणि बागबान हॉटेलला अन्नपदार्थ विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल केटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. कॅम्प येथील गार्डन वडापाव सेंटरची पाहणी केल्यानंतर तेथे अस्वच्छता आढळून आली. तसेच, कामगारांची अस्वच्छता, पाण्याची अयोग्य साठवणूक, विना परवाना व्यवसाय, खराब प्रतीच्या बटाट्यांचा वापर आढळून आला.
यासोबतच पावाचा तपासणी अहवाल नसल्याचेही समोर आले आहे. बागबान रेस्टरँटची प्रशासनाने पाहणी केल्यावर तिथेही अस्वच्छता आढळून आली. एमजी रस्त्यावरील मे. अख्तर केटरर्समध्ये मोठ्या प्रमाणावर समोसा उत्पादन केले जाते. तेथे अस्वच्छतेसोबतच झुरळांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आला. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती 'एफडीए'ने दिली आहे. ही कारवाई सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांच्या पथकाने कली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002