व्हीएस न्यूज -महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राची देखील जडणघडण होत असते. तसेच अभियंता होण्यासाठी सतत चार वर्ष केलेले कष्ट आणि गुरुजनांचे मार्गदर्शन याचे फळ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मिळणारे पदवी प्रमाणपत्र होय. या कार्यकालात आलेल्या अनुभवानेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो. योग्य दृष्टीकोन ठेवून सर्व सामान्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी या अनुभवाचा उपयोग करावा, असे मार्गदर्शन माजी कुलगूरु डॉ. आर.एस.माळी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. एन. बी. चोपडे, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट डिन डॉ. शितलकुमार रवंदळे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी, प्रा. प्रशांत पाटील, समन्वयक प्रा. गफ्फार मोमीन, महाविद्यालयीन परिक्षा अधिकारी प्रा. सुनिल ताडे, प्रा. केतन देसले आणि यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
डॉ आर. एस. माळी म्हणाले की, पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाने केलेल्या मार्गदर्शनामुळे मागील वीस वर्षात पीसीसीओईची ही शैक्षणिक घोडदौड अभिनंदनीय आहे. पीसीसीओईने मागील वर्षात टेडेक्स, केपीआयटी स्पार्कल आणि आयईईई सारखे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो त्यामुळे यावर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत वीस पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले हे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातून पदवी घेऊन गेलेले अभियंते देश परदेशातून नामांकित आस्थापनांमध्ये उच्च वेतन श्रेणी व उच्च पदांवर आहेत आणि संस्थेच्या नावलौकिकात भर घालत आहेत हे आणखी कौतुकास्पद आहे.
विश्वस्त भाईजान काझी म्हणाले की, माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी पुढील शंभर वर्षांचा विचार करुन ही संस्था स्थापन केली. येथून पदवी घेऊन गेलेले हजारो अभियंते जबाबदार नागरिक म्हणून कार्यरत आहेत. येथे विद्यार्थ्यांना फक्त अभियंता नाही, तर प्रतिभाशाली, गुणवत्तापुर्ण व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडविले जाते. या वर्षी संस्थेत विविध शाखांतून चार हजारांहून जास्त विद्यार्था शिक्षण घेत आहेत. त्यांना उच्च मार्गदर्शन व सेवा सुविधा देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ नेहमी प्रयत्नशील असते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वागत प्राचार्य डॉ. नीलकंठ चोपडे , सुत्रसंचालन प्रा. अंजली मिश्रा, प्रा. अश्विनी वझे आणि आभार प्रा. सुनिल ताडे यांनी मानले.
व्हीएस न्यूज -घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं दाम्पत्याला प्राण गमवावे लागले. बुधवारी (13 फेब्रुवारी) पुण्यातील बिबेवाडी परिसरात ही घटना घडली. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं विषारी वायूनं मृत्यू झाला.
पेस्ट कंट्रोलमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. घरातील डास, कीटक घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल केले. पण त्यात दाम्पत्याचाच जिव गेला. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही घटना घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मयतांची नावे आहेत. घरात पेस्ट केल्यानंतर त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. घराची दारे आणि खिडक्या बंदच ठेवल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
यापू्र्वीही झाला होता दोन तरुणांचा मृत्यू –
ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. दोन्ही तरुण एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. कॅन्टीन मालकाने त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. ढेकणांचा त्रास होत असल्याने खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. पेस्ट कंट्रोल केलं असल्याने ते दोघे तीन दिवस मित्राच्या घरी राहिले. नंतर पुन्हा ते आपल्या खोलीवर आले होते.
व्हीएस न्यूज-पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला होता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवारी मुंबईत महामोर्चा निघणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मनसेकडून हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महामोर्चा यशस्वी व्हावा यासाठी राज्यभरातील मनसे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत. पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांना ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे.
पुणे पोलिसांना वाहतुकीवर परिणाम होईल सांगत बाईक रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. तसंच या रॅलीमुळे नागरिकांना त्रास होईल असंही सांगण्यात आलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून या रॅलीला सुरुवात होणार होती. मनसे कार्यकर्त्यांनी मात्र मुस्लिमबहुल भागातून रॅली जात असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांना परवानगी नाकारल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. नारायण पेठ पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही रॅली पार पडणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान रविवारी दुपारी १२ वाजता मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता मोर्चा सुरु होईल. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने ,भक्ती -शक्ती निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षास्टॅंड चे उदघाटन गुरुवारी (दि. ६) रोजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला रिक्षाचालकांनी फेटे परिधान करून या रिक्षास्टॅंड चे स्वागत केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे ,नगरसेवक सचिन चिखले ,उत्तम केंदळे ,पंकज भालेराव ,कमल घोलप, शर्मिला बाबर ,पौर्णिमा सोनवणे ,माजी नगरसेवक सुलभा उबाळे ,तानाजी खाडे ,ऊर्मिला काळभोर ,घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे ,संजय बोराडे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत आणि त्यांनी स्वतःचे रिक्षास्टॅंड निर्माण केले आहे. हे शहराच्या दुष्टीने अभिमानाची बाब आहे. रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. महिलांच्या रिक्षास्टॅंडवर वाचनालय ,पाणपोई आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील ,असे आश्वासन महापौरांनी दिले. बाबा कांबळे म्हणाले कि ,महाराष्ट्र रिक्षा पंचायती आणि घरकाम महिला सभेच्या प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स बॅच ,परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या .यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षा चालक झाले असून ,आता महिलाही रिक्षा चालवणार आहे. महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे त्यांनाही हक्काचे रिक्षास्टॅंड मिळावे यासाठी महिलांचे देशातील पहिले रिक्षास्टॅंड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वसंध्येला या रिक्षास्टँडचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्षा सरस्वती गुजलोर ,यमुना काटकर ,विजयालक्ष्मी हडपद ,जयश्री मोरे,जयश्री साळुंखे,संगीता कांबळे,आयेशा सोळाशे अक्षता गावडे ,सविता ओव्हाळ ,रेखा ठेळके, कविता मैदाड ,रुपाली तिकोने ,दीपाली तिकोने ,मीना रंधवे यांनी परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज -अलीकडेच, चिखलीत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापण्यात आले, त्यानंतर तेथील पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला.
पिंपरी : पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसात अनेकविध क्लुप्त्या वापरून एटीएम फोडून बँकांचे लाखो रुपये पळवण्याचा सपाटा सराईत चोरटय़ांनी लावला आहे. अशा आरोपींचा छडा लागत नसल्याने अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. तरीही एटीएम फोडण्याचे गुन्हे सुरूच असल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येते. एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नसल्याने चोरटय़ांचे चांगलेच फावते, हेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
पिंपरी आयुक्तालयाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम केंद्रातील पैसे ठेवले जाणारे यंत्र फोडून त्यातील पैसे पळवण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांत वाढताना दिसत आहेत. अलीकडेच, चिखलीत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापण्यात आले, त्यानंतर तेथील पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. याच परिसरात अशाच पद्धतीने एटीएम फोडण्याचा दुसरा अयशस्वी प्रयत्न झाला. वाकडला पोलीस ठाण्याच्या जवळच असलेले एटीएम केंद्र गॅसकटरच्या साहाय्याने फोडण्यात आले,मात्र त्यात चोरटय़ांना यश आले नाही. या प्रयत्नात त्यातील आठ लाख रुपये जळून खाक झाले. चाकणला एटीएम फोडण्याच्या दोन घटना घडल्या. त्यातील एका घटनेत, एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने, यंत्राला दोरखंड बांधून ते खेचून बाहेर नेण्यात आले. नंतर ते मोटारीत टाकून इतरत्र नेऊन त्यातील रक्कम पळवण्यात आली.
अशा घटनांमध्ये आरोपींनी लाखो रुपये लांबवले आहेत. बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे तपासात पुढे आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला असून बँकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
अशाप्रकारच्या गुन्ह्य़ांसाठी पोलिसांनी विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे. असे गुन्हे करणाऱ्या पाच गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातील दोन टोळ्या राज्याबाहेरील आहेत. एटीएमसंदर्भातील गुन्हे याच टोळ्यांनी केल्याचा संशय पोलिसांना आहे. आम्ही त्यांच्या मागावर आहोत. बॅँकेला सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. – रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी -चिंचवड पोलीस
व्हीएस न्यूज-दहावीसाठी १५ हजार रुपये तर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते.
महापालिकेची शिष्यवृत्ती योजना
पुणे : महापालिकेच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणारे अर्थसाहाय्य विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली. एकूण सात हजार ८७९ विद्यार्थ्यांना १४ कोटी रुपयांची रक्कम आरटीजीएस पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद अर्थसाहाय्य योजना आणि इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजना महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. शहरात राहणाऱ्या, इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत खुल्या गटातील ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी, महापालिका शाळेत किंवा रात्र प्रशालेत शिकणारे विद्यार्थी तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात. तसेच चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनी ६५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळविल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.
दहावीसाठी १५ हजार रुपये तर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली आहे.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये नऊ हजार ८६२ विद्यार्थ्यांचे अर्ज महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले. त्यापैकी सात हजार ८७९ अर्ज अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पात्र ठरले.
महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत अर्थसाहाय्य वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता धीरज घाटे यांच्यासह समाज विकास विभागाचे विभाग अधिकारी सुनील इंदलकर या वेळी उपस्थित होते. पुढील आठवडाभरात हा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यंदा शिष्यवृत्ती अर्थसाहाय्य वाटपाला काही कारणांमुळे विलंब झाला. मात्र पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शिष्यवृत्ती दिली जाईल आणि त्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
व्हीएस न्यूज- फ्लॅटच्या बाथरुममध्ये हा २९ वर्षीय इसम मृतावस्थेत सापडला.
गॅस गिझरमुळे पुण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पुण्यात कोथरुडमध्ये ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी फ्लॅटच्या बाथरुममध्ये हा २९ वर्षीय इसम मृतावस्थेत सापडला. रामराजे किशोर सकपाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.
ससून हॉस्पिटलमध्ये मंगळवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात गुदमरुन रामराजे याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी ही माहिती दिली. रामराजेंच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी तिथे पोहोचले. दरवाजा तोडून त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. बाथरुमचा दरवाजा तोडला, त्यावेळी रामराजे जमिनीवर पडलेले होते. रामराजेंच्या बाथरुममध्ये एलपीजीवर चालणारा गिझर आहे. तिथल्या खिडक्या बंद होत्या. गिझरमधून विषारी वायू गळती झाल्यामुळे रामराजे यांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा अशी शक्यता प्रतिभा जोशी यांनी बोलून दाखवली.
व्हीएस न्यूज -पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात दोन जणांना अटक केली आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातून ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
पुणे शहरातून गेल्या दीड वर्षात चाइल्ड पोर्नोग्राफीचे तब्बल १५० व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात माहिती दिली असून दोन जणांना अटकही केली आहे. या संदर्भात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातून ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राजकिरण पट्टीलाल (वय २४, रा. गुरुवार पेठ) आणि मनोजकुमार झल्लर सरोज (वय १९, रविवार पेठ) या दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे. हे दोघेही मोल-मजुरी करुन आपली उपजीविका भागवतात, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस महासंचालक कार्यालयाने अशा प्रकारच्या व्हिडिओंबाबतची माहिती पुणे पोलिसांनी कळवली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने हे व्हिडिओ कुठून आणि कसे अपलोड झाले याचा तपास केला. दरम्यान, पुण्यातून हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. तपासामध्ये लॅपटॉप आणि मोबाईलमधील इंटरनेटच्या माध्यमातून हे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांच्या हाती सोमवारी यासंदर्भातील लिंक आल्या होत्या. त्यानुसार कुठल्याही आयपी अॅड्रेसवरुन हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते याचा शोध पोलिसांनी घेतला. यामध्ये पुण्यातून १५० क्लिप्स अपलोड झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी ५ गुन्हे दाखल आहेत. तर पुण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.
व्हीएस न्यूज - दिघी पोलीस ठाणे तपास पथकाकडून आलिशान दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली व त्यांच्या कडून ३ लाख २५००० किमतीच्या एकूण चार दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या . सलमान अन्वर सय्यद (२०) रा. शितळा देवी मंदिर जवळ ,गल्ली क्र - २ ,बोपखेल पुणे , अरबाज हाकीम शहा (२०) रा. गवळीवाडा खडकी बाजार, खडकी ,पुणे, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिघी येथील परांडेनगर परिसरात रात्रीच्या वेळेस दिनांक -२८/०१/२०२० रोजी रिक्षा मधून रेकी करून केटीएम आर.सी २०० ( एम एच -१२-आर बी -६४२४) हि गाडी चोरून घेऊन जाताना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी दिघी ,तळेगाव आणि आळंदी येथून एकूण चार गाड्या चोरल्या असल्याची कबुली दिली . सलमान आणि अरबाजला आलिशान गाड्याची आवड असून या गाड्या त्यांनी स्वतःला वापरण्याकरिता मौजमजेसाठी चोरल्याचे सांगितले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई , पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , परिमंडळ- १ च्या पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील ,सह पोलीस आयुक्त राम जाधव ,दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस तपास पथकाचे सह.पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ , पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे ,पोलीस कर्मचारी राजेंद्र मोरे ,वसंत गायकवाड ,दिनेश डोमाळे हेमंत आव्हाड ,गणेशभूषण गोसावी, चंद्रकांत जाधव ,शशिकांत नांगरे ,रवी नांदे ,विजय पाटील ,मोहन घुगे यांनी केली.
पुढील तपास सह-पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ करीत आहेत .
व्हीएस न्यूज - हिंगणघाट येथील महिलेवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच एका चार वर्षाच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं आळंदी हादरले. चार वर्षाची मुलगी बाहेर खेळत असताना 14 वर्षाच्या अल्पवयीन आरोपींनं तिला मोबाईल दाखवून घरात बोलावलं आणि अत्याचार केला. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि पीडित चिमुकली हे एकाच इमारतीत राहतात. आरोपी हा आई-वडील आणि भावासह तळ मजल्यावर राहतो, तर चार वर्षांची मुलगी पहिल्या मजल्यावर राहते. तळमजल्यावर चिमुकली एकटीच खेळत होती. तेव्हा आरोपीने मोबाईल दाखवून चिमुकलीला घरामध्ये बोलावले आणि तिच्याबरोबर बलात्कार केला. यानंतर आरोपी घरातून पळून गेला. दरम्यान, चिमुकली रडत घरी गेली. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. मुलगी पडली असं तिच्या आईला वाटलं. मात्र तिच्या शरीरावरील जखमा बघितल्यानंतर तिच्या सोबत काही अघटित घडलं असल्याचा संशय त्यांना आला. असं कोणी केलं आहे, असं आईनं मुलीला विचारलं. त्यावर ‘दादा’ ‘दादा’ इतकंच चिमुरडी म्हणत होती. त्यानंतर मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चिमुकलीवर अद्यापही पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली.
फोटो व्हायरल केल्यानं आरोपी सापडला-
घटनेनंतर अल्पवयीन आरोपी पळून घरातून पळून गेला. त्यानंतर जवळच्या शेतात जाऊन झोपला होता. तोपर्यंत आळंदी पोलिसांनी आरोपीच्या तपासाठी पथके रवाना केली. काहींनी त्याचा फोटो व्हायरल केला. दुसऱ्या दिवशी (4 फेब्रुवारी) आरोपी नाश्ता करण्यासाठी शेताच्या बाहेर आला तेव्हा एकाने पोलिसांना फोन करून आरोपीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तातडीने जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
व्हीएस न्यूज - बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्या माध्यमातून पिंपरी येथिल शगून चौकात भव्य आकर्षित सजावट करून जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.पिंपरी चिचवड च्या नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करण्यासाठी चिंचवड शहर मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी सुंदर व्यासपीठ निर्माण करून दिले.
या वेळी शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबूकसवार, जिल्हाप्रमूख गजानन चिंचवडे, शहरप्रमूख योगेश बाबर, शिवसेना शहरसंघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका आनिता तूतारे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, स्वरूपा खापेकर, वैशाली कूलथे, शिल्पा आनपण, वैभवी घोडे, शैला पाचपुते,अनूजा शिंदे, नयना होले, गूलाब गरूड, रोमी संधू, माधव मूळे, संतोष सौदनकर, सावल तोतानी, नितिन घोलप, राष्टवादी काँग्रेस उपाध्यक्ष रमेश नखाते, ग्राहक संरक्षण शहराध्यक्ष गणेश जाधव, वाहतूक आघाडी अध्यक्ष रूपेश यादव, शाम काळे, मिलींदराजे भोसले, दर्शन देसले व सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मातोश्री सामाजिक संस्था कार्याध्यक्ष गोरख पाटील,उपाध्यक्ष प्रदिप दळवी, संघटक अंकूश कोळेकर,उपाध्यक्ष गणेश पाडूळे, माऊली जाधव, रविकिरण घटकार, विशाल बाविस्कर, मारुती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड,दत्ता गिरी, अदिक भोसले, संजय गायके अक्षय घटकार, संतोष हिवाळे, दिपक भक्त, नारायण खूशलानी, जितेंद्र चौधरी, यांनी आयोजन केले.
रक्तदान शिबिराचे आयोजन...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाय सी एम हाॅस्पिटल मधील रक्तपेढी यांच्या माध्यमातून हा उपक्रम थेरगांव येथील शनीमंदिर येथे पार पडला.
या शिबिरात अनेक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग घेतला, मोठ्या संख्येने शिवसैनिक व मातोश्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी रक्तपेढीत ६० पिशव्या जमा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, प्रहार संघटनेचे संजय गायखे,यांनी केले होते.या कार्यक्रमाला पिंपरीगावातील नगरसेवक संदिप वाघेरे यांनी देखील रक्तदान केले व कार्यक्रमाचे कौतूक केले.
या वेळी गूलाब गरूड, संदिप कापसे, नितीन घोलप, डाॅ योगेश कूलथे, सूदर्शन देसले, निखील येवले, स्वरूपा खापेकर, जिल्हा संघटिका अनिता तूतारे, चिंचवड विधानसभा संघटिका सौ शिल्पा आनपण, रहाटणी विभाग संघटिका वैशाली कूलथे, भाग्यश्री म्हस्के उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, रविकिरण घटकार, गणेश पाडूळे, माऊली जाधव, अधिक भोसले,नरसिंग माने, अक्षय घटकार, दिपक भक्त, दत्ता गिरी, यांनी केले.
व्हिएस न्युज - कंत्राटी कामगार कायदा, ‘निम’ कायदा असे कामगारांच्या न्याय हक्कांवर गदा आणणारे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत. 2016 साली केंद्र सरकारने लागू केलेला ‘एनसीएलटी’ (NATIONAL COMPANY OF LAW TRIBUNAL) कायदा रद्द करुन पुर्वीचाच ‘बीआयएफआर’ (BEAURO OF INDUSTRIAL FINANCIAL RESTRUCTCURE) हाच कायदा अंमलात आणावा. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय कामगार संघटना संयुक्त कृती समिती माघार घेणार नाही. असे प्रतिपादन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिले.
बुधवारी, देशातील सर्व संघटीत, असंघटीत कामगारांचा देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला होता. या संपात देशभरातील बारा राष्ट्रीय कामगार संघटनांसह इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एआययूटीसीयू, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटी यूसी, या देशभरातील संघटनांसह सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगार संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. यानिमित्त पुणे जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून हजारो कामगार रॅलीने वाकडेवाडी पुणे येथील कामगार आयुक्त कार्यालयाजवळ जमले होते. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला. यानंतर झालेल्या सभेत डॉ.कदम बोलत होते.
यावेळी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी डॉ. रघुनाथ कुचिक, इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. म.वि.अकोलकर, सीटूचे पुणे जिल्हा अध्यक्ष अजित अभ्यंकर, विमा कामगार संघटनेचे चंद्रकांत तिवारी, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, बँक एम्प्लॉइज फेडरेशन विश्वास जाधव, विमा कामगार संघटना चंद्रकांत तिवारी, नर्सेस फेडरेशनच्या सुमन टिळेकर, थिटे मॅडम, पुणे जिल्हा डिफेन्स कॉर्डिनेशनचे शशिकांत धुमाळ, बँक कर्मचारी संघाचे सुनिल देसाई, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भट, एआयबीईए संघटनेचे दिपक पाटील, पोस्टल एम्प्लॉइज युनियनचे रघुनाथ ससाणे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शुभा शमिम, पिसाळ मॅडम, नगरसेवक अजित दरेकर, माजी नगरसेवक मारुती भापकर, कॉंग्रेस पदाधिकारी संगीता तिवारी, सचिन आडेकर, रमेश अय्यर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगताप, इंटक पुणे जिल्हा सेक्रेटरी मनोहर गडेकर, आयटकचे व्ही.व्ही. कदम, अनिल रोहम, सीटूचे पुणे जिल्हा सचिव वसंत पवार, कामगार नेते अनिल औटी, किरण मोघे, दत्ता येळवंडे, संतोष खेडेकर, संतोष पवार, स्वप्निल बारमुख, चारुदत्त वैरु, सुभाष वाघमारे, मोहन पोटे, नवनाथ नाईकनवरे, किरण भुजबळ, विठ्ठल गुंडाळ, सुरेश सरडे, विजय राणे, संदिप अहिरे, गिरीष मेंगे, शशिकांत महांगरे, गोरख दोरगे, वसंत बुचडे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, शांताराम कदम, यशवंत सुपेकर, सचिन कदम आदींसह हजारो कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ कुचिक म्हणाले की, बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक देशात आली पाहिजे हीच कामगारांची भूमिका आहे. परंतू, कंपन्या उभ्या राहत असताना कामगार कायद्याचे व कामगारांच्या सुरक्षिततेचेदेखील पालन झाले पाहिजे. सेवा व उत्पादन क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या ‘कामगार’ ही संज्ञाच रद्द करण्याचे धोरण राबवित आहे. कामगारांचे हित डावलून भांडवलदारांसाठी केंद्र सरकार अनूकूल कायदे करीत आहे. उच्च शिक्षितांना मल्टी नॅशनल कंपन्या, व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, अधिकारी, पर्यवेक्षक अशा पदांवर नेमूण त्यांना व्यवस्थापनात घेतात. त्यामुळे हे कामगार हक्कांपासून डावलले जातात. डॉ. बाबा आढाव म्हणाले की, कष्टकरी कामगारांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. असंघटीत कामगारांना नोकरीची शाश्वती नाही. त्यांना किमान वेतन देखील मिळत नाही. हे केंद्र सरकार कष्टक-यांच्या घामाला योग्य मोल देत नाही. आता किमान वेतन 21 हजार रुपये मिळालेच पाहिजे. तोपर्यंत माघार नाही.
अजित अभ्यंकर म्हणाले की, बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक देशात आली पाहिजे हीच कामगारांची भूमिका आहे. परंतू, कंपन्या उभ्या राहत असताना कामगार कायद्याचे व कामगारांच्या सुरक्षिततेचेदेखील पालन झाले पाहिजे. सेवा व उत्पादन क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या ‘कामगार’ ही संज्ञाच रद्द करण्याचे धोरण राबवित आहे. कामगारांचे हित डावलून भांडवलदारांसाठी केंद्र सरकार अनूकूल कायदे करीत आहे. उच्च शिक्षितांना मल्टी नॅशनल कंपन्या, व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, अधिकारी, पर्यवेक्षक अशा पदांवर नेमूण त्यांना व्यवस्थापनात घेतात. त्यामुळे हे कामगार कामगार हक्कांपासून डावलले जातात. त्यांची सामाजिक सुरक्षितता, नोकरीची शाश्वती संपुष्टात येते. याला सर्व कामगार संघटनांचा विरोध आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच आजचा राष्ट्रीय संप पुकारण्यात आला आहे. देशातील सर्व प्रमुख कामगार संघटनांनी एकत्र येऊन गेली काही वर्षे सातत्याने अर्थव्यवस्थेचे जनविरोधी उदारीकरण, खाजगीकरण, बाजारीकरण तसेच रोजगाराचे कंत्राटीकरण यांच्या विरोधात संघर्ष चालविला आहे. अनेक अखिल भारतीय संप तसेच अन्य संघर्षांच्या कृती करून कामगार कष्टकर्यांना एका मंचावर आणून लढ्यात उतरविले आहे. त्याचा परिणाम म्हणून वरील प्रक्रियांची गती काही प्रमाणात रोखण्यात यश आलेले असले तरीदेखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने आता मात्र सर्व मर्यादा सोडून देशाला आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावरच उभे केलेले आहे. बेरोजगारीच्या खाईमध्ये देशाची तरूण पिढी तसेच कोट्यावधी श्रमिक भरडला जात आहे.
या सभेनंतर कामगार संघटना संयुक्त कृतीसमितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्यासह शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी जयश्री कटारिया यांना निवेदन दिले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002