व्हीएस न्यूज - चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आणि गुरुवारी (29 आणि 30 डिसेंबर) 'प्राचीन भारतीय संस्कृती' या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमाला आणि 'भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन' या विषयावरील कार्यशाळेचे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी चापेकर समितीचे अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे आणि कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी गिरीष प्रभुणे यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे (आयसीसीआर) अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
"भारतीय संस्कृतीचा उगम कधी आणि कसा झाला, भारतीयांचे मूळ भारतात आहे की भारताबाहेर याविषयीचे वास्तव समोर आणणारे वैज्ञानिक पुरावे गेल्या काही वर्षांत जगासमोर आले. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ वसंत शिंदे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय गटाने राखीगढी या हरियाणातील पुरास्थळाचे उत्खनन करून तिथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांचे डीएनए विश्लेषण केले. त्या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीनुसार राखीगढी येथे राहणारी माणसे आणि आजचे भारतीय यांच्या डीएनएमध्ये समानता असून, राखीगढी आणि आजचे भारतीय या दोघांचेही मूळ प्राचीन काळापासून भारतातच आहे. यापूर्वी सापडलेल्या पुरातत्वशास्त्रीय पुराव्यांना आता डीएनए अभ्यासाची जोड मिळाल्याने भारतीयांचे मूळ भारताबाहेर असल्याचा सिद्धांत आता कालबाह्य झाला असल्याचे वैज्ञानिक जगताने मान्य केले.
डॉ. वसंत शिंदे या संपूर्ण संशोधनाविषयी, तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी दोन भागांतील जाहीर व्याख्यानांतून 29 आणि 30 डिसेंबर रोजी सचित्र सादरीकरण करतील." "जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक स्थळे, रचना, कलाकृती, लिखित- मौखिक साहित्य, पारंपरिक कौशल्ये देशाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सर्व घटकांविषयीच्या शास्त्रीय नोंदी लोकसहभागातून जमा करून त्यांची सद्यःस्थिती नोंदविणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे.
या प्रकल्पासाठीची ही पहिली कार्यशाळा होत आहे. यात डॉ. प्रमोद दंडवते, डॉ. श्रीकांत गणवीर, गिरीश प्रभुणे, प्रदीप रावत, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुणचंद्र पाठक, रमेश पडवळ आणि मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत. त्याच प्रमाणे दोन्ही दिवस पारंपरिक कला आणि कौशल्यांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी सहभागींना मिळणार आहे", असे गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.
या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि वारसाप्रेमी यांनी नोंदणी केली आहे. डॉ. वसंत शिंदे यांची जाहीर व्याख्याने, तसेच कार्यशाळेतील काही व्याख्याने सोशल मीडियावर फेसबुक लाइव्हव्दारे ऑनलाइनही प्रसारित करण्यात येतील," असे प्रभुणे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - काळेवाडी फाटा येथील पीर बाबा मंदिराजवळ एका अज्ञात व्यक्तीने वाहनाने सात वर्षाच्या मुलाला त्याच्या आई आणि वडिलांना धडक देऊन पळून गेल्याची घटना पहाटे ०४.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. या अपघातात आई आणि वडील जखमी झाले पण सात वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेला.
संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले.
पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तिघांना एका वाहनाने धडक दिली. त्यानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सात वर्षांचा मुलगा संघर्ष याचा जागीच मृत्यू झाला होता तर त्याचे आई आणि वडील जखमी झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मूगळीकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि संतोष पाटील आणि सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हा तत्काळ उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सह पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, पोलीस नाईक अतिक शेख, पोलीस नाईक विक्रांत चव्हाण यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी काळेवाडी फाटा परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अज्ञात वाहन आणि वाहन चालकाचा सुगाव लागला आणि त्याला अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक आरसा आढळला होता. तो वाहनाच्या डाव्या बाजूचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरून देखील तपास करण्यात आला. हा अपघात एका अशोक लेलँड टेम्पोने केला असून तो टेम्पो थेरगाव येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला. त्यावरील चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी हा टेम्पो त्याचा मित्र तेजस शशिकांत बारसकर याच्याकडे होता. पोलिसांनी तेजस याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपघात झाल्यानंतर आरोपी तेजस घटनास्थळावरून घाबरून पळून गेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक जितेंद्र गिरनार करीत आहेत.
व्हीएस न्यूज - तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबईतील इंदू मिल येथे होणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आणि त्या जागेबाबत इतिहासीक निर्णय घेतला. देशातील सर्व आंबेडकरी अनुयायांना कॉंग्रेस नेहमीच न्याय देण्याची भुमिका घेत असते. भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभासाठी देखील महाविकास आघाडी सरकारने भरघोस निधी जाहिर केला आहे. हा दिवस आंबेडकरी जनतेसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. म्हणून शहर कॉंग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करीत आहोत. यासाठी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले यांनी पाठपुरावा केला त्यांचाही उचित गौरव शहर कॉंग्रेसच्या वतीने करताना मला अभिमान वाटत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळातील कॉंग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचेही अभिनंदन करीत आहोत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे प्रतिपादन असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि परिसर विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील तीस कोटी रुपयांचा निधी पायाभूत सेवासूविधांसाठी उपलब्ध करुन दिला. यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी पाठपूरावा केला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने डंबाळे यांचा शुक्रवारी पिंपरीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगूच्छ देऊन आणि पेढे वाटून सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डंबाळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मानित केले.
राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे तसेच बाबा कांबळे, सुवर्णा डंबाळे, नितीन धोत्रे, गोपाळ मोरे, गंगाताई धेंडे, कविता खराडे, मनिषा गटकळ, सारीका पवार, आशा शिंदे, विमल गायकवाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले.
यावेळी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले सांगितले की, पुणे- भिमाकोरेगांव शौर्य दिन कार्यक्रम 1 जानेवारी 2022 रोजी मोठया संख्येने साजरा होणार असून याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना सर्व प्रकारच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे. यंदाच्या वर्षी भिमाकोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करणेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समन्वय समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितिन राऊत, माजी मंत्री प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. उत्सवाच्या तयारीसाठी भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठका घेण्यात आल्या होत्या.
गुरुवारी या संदर्भामध्ये जिल्हा परिषद पुणे येथे तहसिलदार व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे समवेत इतर सर्व विभागाच्या अधिका-यांशी व आंबेडकर समाजातील पक्ष संघटनांशी संयुक्त बैठक झाली. यात जिल्हा प्रशासनाने सदर ठिकाणी संरक्षण, पिण्याचे पाणी, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादी प्रकारच्या पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. दरम्यान यंदाच्यावर्षी सर्व राजकीय पक्षाच्या अभिवादन सभा आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल याचा देखील कार्यक्रमात समावेश राहणार आहे. दरम्यान भिमाकोरेगांव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे याबाबतची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली असुन त्यासाठी तब्बल १०० कोटींचा बृहत आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरु असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या बद्दल आम्ही राज्य सरकार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष आभार मानत आहोत. या उत्सवात नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - विविध मागण्यांसाठी 8 नोव्हेंबर पासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप सुरु आहे. या कर्मचा-यांच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळ आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केली आहे. एस. टी. महामंडळाचे संचालक, भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार आणि दलाल यांचा महामंडळाच्या राज्यभर असणा-या लाखो कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता आणि पाच हजार एकरांहून जास्त असणा-या जमिनींवर डोळा आहे. एस. टी. महामंडळ कायम तोट्यात असल्याचे व्यवस्थापन सांगते.
महामंडळातील भ्रष्ट अधिकारी, व्यवस्थापन हे एस. टी. चे खासगीकरण करुन कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी अनुकूल आहे. परंतू एस. टी. च्या पुरवठादारांवर कारवाईचे धाडस दाखवत नाहीत. अधिकारी व पुढारी संगनमताने फायद्यात चालणारे मार्ग शिवशाही, शिवनेरीच्या पुरवठादारांना आंदण म्हणून देत आहे. एस. टी. ने सरासरी रोज 65 लाख प्रवाशी प्रवास करतात. तर मागील सात वर्षांपासून प्रत्येक प्रवाशी तिकीटामागे एक रुपया अधिभार लावण्यात आला आहे.
1992 सालापासून प्रत्येक कर्मचा-यांच्या वेतनातून दरमहा 45 रुपये मृत्यू फंड म्हणून कपात केली जाते. एस. टी. ला लागणा-या डिझेलवर राज्य सरकार प्रतिलिटर 35 रुपये कर आकारते. व्यवस्थापन आणि पुढारी संगणमताने करत असलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील एस. टी. चा तिकीट दर गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील दरांपेक्षा 25 टक्क्यांहून जास्त आहे. तसेच प्रत्येक प्रवाशांच्या तिकीटावर 17.5 टक्के प्रवाशी कर आकारला जातो. या व्यतीरीक्त प्रत्येक वाहनांमागे दरवर्षी व्यावयायिक वाहनकर आकारला जातो. या विविध करातून जमा होणा-या लाखो कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा अशीही मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी यावेळी केली.
गुणवंत कामगार कल्याण मंडळ, एस. टी. कामगार कृती समिती पिंपरी चिंचवड आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. 15 डिसेंबर) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. चव्हाण बोलत होत्या. यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे, उपाध्यक्ष राज अहिरराव, एस. टी. कामगार प्रतिनिधी सुदर्शन पजई, ओमप्रकाश गिरी, भरत नाईक, राजाभाऊ गिते, अश्विनी गायकवाड, अनुराधा नाईकवडे, मानिनी फाऊंडेशनच्या शोभा देशपांडे, सुहासिनी भोसले, अर्चना जिलेवार, सविता मोरे तसेच भरत शिंदे, संजय गोळे, आण्णा जोगदंड, गोरक्ष वाघमारे, कल्पना भाईंगडे, महादेव धर्मे, बशीर मुलाणी, प्रकाश शिंदे, प्रविण मोहिते, योगेश शिंदे, अविनाश शेंडगे, बापू जाधव, विजय साबळे आदी उपस्थित होते. व्यवस्थापन राज्यातील प्रवासांना सेवा देण्याऐवजी ठेकेदार आणि पुढा-यांच्या बगलबच्यांना पोसण्याची सेवा करीत आहे.
कोणाचीही मागणी नसताना एस. टी. मध्ये 150 कोटी रुपये खर्च करुन वायफाय सुविधा बसवली त्याची आता काय अवस्था आहे ? निकृष्ठ दर्जाचे गणवेश कर्मचा-यांना देण्यासाठी 100 कोटी रुपयांहुन जास्त दरवर्षी खर्च केला जातो. 24 हजार रुपयांना मिळणारी ट्रायमॅक्स मशिन टेंडर बेसिसवर भाड्याने घेतली आहे यासाठी प्रत्येक तिकीटामागे पुर्वी 20 पैसे प्रती तिकीट आकारले जायचे ते आता 1 रुपया 21 पैसे आकारले जातात. हे मशिन घेण्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या मशिनची मोडतोड झाल्यास वाहकाकडून 24 हजार रुपये वसूल केले जातात.
खासगी शिवशाही बसला 59 रुपये प्रतीलिटर दराने डिझेल दिले जाते. डिझेलचा बाजारभावाचा दर वजा 59 रुपये यातील तुट एस. टी. महामंडळाला सहन करावी लागते. म्हणजेच खासगी शिवशाही चालविणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार आहे. अहोरात्र रस्त्यावर धावणा-या एस. टी. चे लोकेशन कळण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करुन व्हि.टी.एस. यंत्रणा खरेदी केली आहे. आज काल प्रत्येक चालक वाहकांकडे मोबाईल असताना हा 100 कोटी रुपयांचा खर्च कोणासाठी केला ? खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर मुक्कामी जाणा-या चालक, वाहकांना तेथे कोणतीही सुविधा मिळत नाही. तेथिल शाळा किंवा मंदीराच्या ओसरीवर मच्छर मारत रात्र जागून काढावी लागते. एस. टी. च्या अंतर्गत स्वच्छतेबाबत आणि एस. टी. स्टॅंड, डेपो, कार्यशाळा येथील स्वच्छतेसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतू प्रत्यक्षात या स्वच्छतेबाबत काय अवस्था आहे ? या प्रश्नांची उत्तरे आणि जमा खर्चाचा खरा हिशोब नागरीकांना आता मिळाला पाहिजे. एस. टी. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे हि आता कर्मचा-यांबरोबरच, प्रवाशांची आणि सर्व सामान्य नागरीकांचीही मागणी आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले की, 8 नोंव्हेबर पासून सुरु असणा-या या संपामध्ये एस. टी. च्या 93 हजारांहून जास्त कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. मागील दोन वर्षात 53 हुन जास्त कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या कर्मचा-यांप्रती सांत्वन करण्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब हे ‘मेस्मा’ लागू करण्याची धमकी देत आहेत. या धमकीला घाबरुन आजपर्यंत पाच टक्केही कामावर रुजू झाले नाहीत. 10 हजारांहून जास्त कामगारांवर व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. औरंगाबादसह अनेक विभाग अधिका-यांनी या कामगारांना चौकशीच्या नोटीसा बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. या कामगारांवर मानसिक दडपण वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. आता सरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि राज्यातील जनतेला देखिल वेठीस धरु नये अशीही मागणी डॉ. भारती चव्हाण यांनी केली.
1960 साली पुणे - अहमदनगर पहिली एस. टी.ची सेवा सुरु झाली. तेंव्हापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत एस. टी. कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. या महामंडळाचे राज्य सरकारी कर्मचा-यांमध्ये विलिनीकरण करावे आणि इतर मागण्या सकृतदर्शनी योग्य असल्याचे आमचे मत आहे. एस. टी. कर्मचा-यांच्या व्यथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. 35 ते 40 वर्ष सेवा करुनही या कर्मचा-यांना अवघे दोन ते तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. चालक - वाहक यांची स्टेअरींग ड्युटी विचारात घेतली जाते. परंतू रस्त्यातील अपघात, वाहतूक खोळंबा, गाडी बंद पडणे हे विचारात न घेता वेळेचे बंधन दाखवून वेतन कपात केली जाते. या महामंडळात रुजू होणारा प्रत्येक कर्मचारी निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत ‘तात्पुरत्या समय वेतन श्रेणी’ वर असतो. काही कर्मचा-यांना तर निवृत्तीच्या शेवटच्या आठवड्यात ‘ कायम समय वेतन श्रेणी’ चे पत्र दिले जाते. हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा उद्या गुरुवार दिनांक १६ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. याबाबतचा आदेश महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे, दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे.
राज्य सरकारने १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याची मान्यता दिली होती. परंतु, कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आला. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली. त्यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. कोरोना नियमांबाबत उपाययोजना शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण विषय सुविधा सुनिश्चित कराव्यात. जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धतता करावी लागणार आहे.
ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. अशांना ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवावे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी.
व्हिएस न्यूज - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या विविध पदांसाठी इच्छुकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे या गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) पिंपरी चिंचवड दौ-यावर येणार आहेत.
यावेळी सव्वालाखे या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. तरी शहर महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणा-यांनी गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) सावित्रीबाई फुले स्मारक (हॉल), महात्मा फुले पुतळ्या मागे, गांधीनगर जवळ, पिंपरी येथे सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले आहे.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कायदा सेल विभागाचे अध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पांढारकर यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी शनिवारी (दि. 11 डिसेंबर) ॲड. कांबळे व पांढारकर यांना नियुक्तीचे पत्र दिले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांचे सोमवारी (दि. 13 डिसेंबर) पिंपळे निलख येथील कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशुराम गुंजाळ, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेते संदेश नवले, राजाभाऊ काळभोर, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष मकरध्वज यादव, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मिडीया समन्वयक चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, प्रतिक्षा कांबळे, कुंदन कसबे, वसिम शेख, पांडूरंग जगताप, गुंगा क्षिरसागर, आण्णा कसबे, हर्षवर्धन पांढारकर आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या बरोबरच या दोन नवनियुक्त शहर कार्याध्यक्षांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. कांबळे व पांढारकर हे शहर कॉग्रेसच्या सर्व कार्यक्रमात विविध आंदोलनात नेहमीच सक्रिय असतात. यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांची नियुक्ती केली आहे.
व्हिएस न्यूज - न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्याय न मिळाल्या प्रमाणेच असतो. परंतू, त्याला छेद देणारा निकाल पिंपरी-चिंचवड न्यायालयाने मंगळवारी (ता.१४) दिला. विशेष म्हणजे जलद न्यायाची अपेक्षा असलेल्या महिलाविषयक खटल्यात हा निवाडा करण्यात आला, फक्त ४८ तासांत म्हणजे दोन दिवसांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दस्तगीर पठाण यांनी विनयभंगाच्या खटल्यातील आरोपीला दोषी धरून सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाच्या चपळाईबरोबर पोलिसांचाही जलद तपास या वेगवान न्यायाला कारणीभूत ठरला आहे. हा गुन्हा घडल्यानंतर चिंचवड पोलिस सह.पोलीस निरीक्षक आणि या गुन्ह्याचे तपासाधिकारी विकास मडके यांनी फक्त २४ तासांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्याला तशीच वेगवान साथ व सहकार्य त्यांना सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांचे मिळाले. त्यांनी हा खटला जलद चालवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्यच केली नाही, तर त्यावर जलदगतीने अंमलबजावणीही केली. त्याच्यामुळे १० तारखेला घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपीला लगेच दोन दिवसांत शिक्षा झाली.
सुरेशकुमार मोहनलाल (वय २२, रा. वेताळनगर चिंचवड मूळचा जम्मू-काश्मीर) असे त्याचे नाव आहे. या घटनेतील फिर्यादी २३ वर्षीय नवविवाहिता आहे. तिच्यावर अत्याचार करून आरोपीचा जम्मू-काश्मीरला पळून जाण्याचा बेत होता, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी व फिर्यादी एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी पहिल्या, तर आरोपी दुसऱ्या मजल्यावर रहावयास आहे. घटनेच्या दिवशी आरोपी हा फिर्यादींच्या उघड्या दरवाजातून घरात घुसला. त्याने दरवाजा आतून बंद करीत फिर्यादींचा विनयभंग केला.त्यावर त्यांनी आरडाओरडा केला. एवढेच नाही, तर आरोपीच्या तावडीतून त्यांनी सुटकाही करून दिली.
दरम्यान, त्यांच्या आरडाओरड्याने आरोपी घाबरला. दरवाजा उघडून त्याने पळ काढला. फिर्यादीही त्यांच्या मागे धावल्या. हे पाळून तळमजल्यावरील पार्किंगमधील रहिवाशांनी पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
त्यानंतर मडकेंसह पोलीस हवालदार केदारी, पोलीस नाईक सोनपेटे, पोलीस शिपाई बाविस्कर यांनी जलद तपास करून दुसऱ्याच दिवशी ११ तारखेला चार्जशीट दाखल केले. १२ तारखेला रविवारी कोर्टाला सुट्टी असते. अन्यथा २४ तास अगोदरच म्हणजे कालच सोमवारी हा निकाल लागला असता.
दरम्यान, या जलदगती निकालाने समाजात एक चांगला संदेश जाणार आहे. आरोपीला लवकर शिक्षा झाल्याने असे गुन्हे करण्यास आरोपी सहसा धजावणार नाहीत. परिणामी त्यांना व या गुन्ह्यांनाही आळा बसेल, अशी प्रतिक्रिया या खटल्यात सरकार तथा पोलिसांची बाजू मांडलेल्या सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांनी दिली. अशा निकालाने धास्ती निर्माण होऊन महिलांविषयक गुन्हे कमी होतील, असेही त्या म्हणाल्या.
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून बनावट बिस्किटे देऊन फसवणूक करणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील 'सोन्याचे बिस्किट गँग'च्या प्रमुखासह सात जणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतरची ही पहिली मोक्का कारवाई , या लोकांकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास आयुक्त कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये सोन्याच्या बिस्किट गँगवर विविध सात गुन्हे दाखल आहेत. गँगप्रमुख प्रकाश साळवे व त्याच्या गँगमधील इतर सहा जण तळेगाव दाभाडे व परिसरात सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या उद्देशाने बनावट बिस्किटे देण्याचा प्रकार करीत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे झाले होते.
आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर गंभीर स्वरूपाचे आणि एकाच प्रकारे वारंवार गुन्हे दाखल करण्याऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले होते. या आदेशानंतर माहिती संकलित होताच या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त गणपत माडगूळकर यांनी आयुक्तांकडे दिला होता. त्यानंतर आयुक्त पद्मनाभन यांनी कारवाई करण्यास परवानगी दिली होती.
परंतु सत्रन्यायालयाने ( दि.३) यातील आठ महिन्यांपासून कारागृहात बंद असलेला आरोपी तेजस प्रकाश साळवे याचा जमीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणी न्यायालयात अॅड.राजेश रणपिसे यांनी आरोपी तेजस साळवे ची बाजू मांडली. ॲड.राजेश रणपिसे यांनी आरोपी साळवे च्या बाजूने केलेला युक्तिवाद न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी ग्राह्य धरून जमीन मंजूर केला.
शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक मोशी प्राधिकरण येथे संपन्न
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांना सामोरे जात असताना कॉंग्रेसचे सर्व आजी - माजी नगरसेवक, आजी - माजी पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शहर कॉंग्रेसच्या पदाधिका-यांची निवड नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकाविण्याचे ध्येय ठेवून पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
रविवारी (दि. 12 डिसेंबर) शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक डॉ. कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मोशी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॅा. पी. बी. कुंभार, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे माजी प्रदेश अध्यक्ष मनोज कांबळे, उपाध्यक्ष उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, अख्तर चौधरी, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह वालिया, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला नेत्या छायाताई देसले, नंदाताई तुळसे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुनिल राऊत, अबूबक्र लांडगे, मल्याळी समाज नेते के. एम. रॉय, के. हरी नारायणन, विश्वनाथ जगताप, आनंदराव फडतरे, आदम पटेल, शब्बीर इनामदार, इरफान शेख, याकूब इनामदार, बाबा बनसोडे, हिराचंद जाधव, निखिल भोईर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आबा खराडे, सतिश भोसले, किरण नढे, इस्माईल संगम, नयन पालांडे, रवी नांगरे, प्रकाश पठारे, किरण खाजेकर, प्रा. संजय पवार, वामन ऐनिले, अमर नाणेकर, अक्षय शहरकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील पाच वर्षांतील महानगरपालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभारावर सर्व सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील. यासाठी आपण सर्वांनी कॉंग्रेसची ध्येय धोरणे मतदारांपुढे घेऊन जाऊ.
शेतक-यांनी एकजुटीने ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीला पायबंद घालण्यासाठी वर्षभर आंदोलन करुन पंतप्रधानांना माघार घेण्यास भाग पाडले. त्याच प्रमाणे आपण सर्वजण एकजूटीने महानगरपालिकेतील भाजपाची सत्ता उलथून टाकू. या निवडणूकीत कोणाबरोबर आघाडी करायचे ते वरिष्ठ ठरवतील. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच उपेक्षित, वंचित समाज आणि सर्व जाती धर्मातील नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्व घटक त्रस्त आहेत. आता कॉंग्रेसला पक्ष वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.
आगामी निवडणूकीसाठी इच्छुक असणा-या कार्यकर्त्यांनी आपली नावे द्यावीत, कार्य अहवाल द्यावा तसेच निवडणूक विभागाने तयार केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर योग्य वेळी आक्षेप, हरकती घ्याव्यात असेही या बैठकीत ठरले. प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे म्हणाले की, डॉ.
कैलास कदम यांच्या माध्यमातून शहराला सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नियुक्तीपासून पक्ष संघटनेत नवचैतन्य आले आहे. शहर कार्यकारिणी करताना सर्व जाती धर्मातील, ज्येष्ठ, महिला, युवक, युवतींना, कामगारांना संधी देण्यात येईल. नरेंद्र बनसोडे, विश्वास गजरमल, मनोज कांबळे, वसिम इनामदार, शामला सोनवणे, निगार बारसकर, कविचंद भाट आदींसह या बैठकीत सर्व उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अभिमन्यू दहितुले आणि आभार उमेश बनसोडे यांनी मानले.
व्हिएस न्यूज - पिंपरी चिचंवड (प्रतिनिधी) पाणीपुरवठा विभागाच्या टेंडर, टक्केवारीमध्ये स्वारस्य दाखविणा-या भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेतील सत्ताधा-यांनी शहरवासीयांचे पाणी रोखून त्यांना वेठीस धरू नये. अन्यथा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.
पिंपरी चिंचवडमधील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात पाणी समस्या वाढविण्यास सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे सांगताना संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक, विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी होते. तरीही सत्ताधारी आणि प्रशासनाला दररोज पाणीपुरवठा करता आलेला नाही.
एकीकडे शहरात दररोज पाणीपुरवठा होत नसताना दुसरीकडे दिवसाआड पाणी देखील नागरिकांना सुरळित दिले जात नाही. शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. वेळी अवेळी नागरिकांना पाणी सोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात २४ पाणीपुरवठा देण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, भाजप सत्तेत आल्यानंतर या नियोजनात पाणी फेरले गेले. सत्ताधारी भाजपच्या कारभा-यांना पाच वर्षात विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही. भरमसाठ कामे काढून सल्लागार, ठेकेदारांवर खर्च करण्याला त्यांच्यामार्फत प्राधान्य दिले गेले. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. शहरातील नव्याने झालेल्या शेकडो बांधकामांना पाणी देण्यास महापालिका असमर्थ आहे.
आंद्रा, भामा आसखेड धरणाचे पाणी आरक्षित करून ते शहरात आणण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुरु झाले. भाजपला त्या प्रकल्पाचे देखील नियोजन करता आलेले नाही. भाजपच्या पदाधिकारी आणि कारभारी आमदारांकडून केवळ कामांची पाहणी करून महिना दोन महिन्यात शहराला पाणी मिळेल, अशा वल्गना सतत केल्या जात आहेत.
परंतु, या कामाला गती देण्यासाठी काही करताना ते दिसत नाहीत. केवळ भुलथापा मारून, जनतेची दिशाभूल करून पाणीपुरवठ्यासाठी सत्ताधा-यांनी जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. ते थांबवावे आणि शहराला दररोज सुरळित पाणीपुरवठा करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस बोंबाबोंब आंदोलन करणार आहे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे. –
दिवसाआड पाणी, हेच भाजपचं शहर परिवर्तन
पिंपरी चिंचवड शहरात सुरळित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियोजन करण्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात प्रश्न अपयशी ठरले आहे. भाजपने स्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तन कार्यालयाच्या माध्यमातून मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा दावा केला होता. स्मार्ट सिटीच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. तर, शहर परिवर्तन कार्यालयाच्या नावाखाली सुमारे १३ कोटींचा खर्च केवळ सल्लागारावर केल्याची माहिती आहे. पाच वर्षापूर्वी दररोज असणारा पाणीपुरवठा भाजपने दिवसाआड केला, हेच परिवर्तन भाजपनं करून दाखवलं, अशी बोचरी टीका वाघेरे पाटील यांनी केली.
व्हीएस न्यूज - सावित्रीबाल फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यामुळे पुण्यातील या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क पार्कमध्ये महिला उद्योजकांनी त्यांचे कार्य दाखवणे अत्यंत समर्पक आहे ,असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पीयूष गोयल यांनी आज पुणे विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कला भेट दिली.
महाराष्ट्रात स्टार्ट-अप संस्कृतीचे नेतृत्व महिलांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत "आपण उद्योजकीय चौकट जिवंत ठेवली पाहिजे," असे ते म्हणाले. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये स्टार्ट-अपमध्ये कार्यक्षेत्राचा भाग म्हणून नोंदणीकृत 46 टक्के एककांमध्ये महिला भागीदार आहेत त्याचप्रमाणे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांचा स्टार्टअप्समध्ये 45 टक्के वाटा आहे, ही बाब उत्साहवर्धक आहे .” असे त्यांनी सांगितले.
इनक्यूबेटरची तुलना पालकांशी करताना मंत्री म्हणाले की, हे दोघेही मार्गदर्शक आणि समर्थक असून त्यांची स्टार्ट-अप्सना गरज आहे.“आज आपल्याकडे संपूर्ण भारतभर स्टार्टअप कार्यक्षेत्र आहे. भारतात 50000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स नोंदणीकृत असून हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप कार्यक्षेत्र आहे'', असे ते म्हणाले.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये केलेल्या नोंदणीनुसार पुण्यात 3200 तर मुंबईत 3274 स्टार्ट-अप्स आहेत, अशी माहिती देत मंत्र्यांनी पुणे-मुंबईमधील ही निकोप स्पर्धा सुरू ठेवावी, अशी सूचना केली. पुण्यात असलेले उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमुळे स्टार्ट-अपला पाठबळ देण्यात पुण्याच्या अनोख्या योगदानाचे वर्णन करत गोयल म्हणाले की, स्टार्ट-अप कार्यक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची वेळ आली आहे. स्टार्ट-अप्सच्या भरभराटीसाठी, अकादमी, उद्योग आणि संशोधन यांच्या सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारतातील 79 युनिकॉर्नपैकी 4 पुण्यातील आहेत ही आनंददायी बाब आहे, असे ते म्हणाले. पुणे विद्यापीठातील विज्ञान तंत्रज्ञान पार्कमध्ये 153 स्टार्ट अप्स आहेत. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कमध्ये दिव्यांग लोकांसाठी दाखवण्यात आलेले काही नवनवीन शोध उत्कंठावर्धक होते हे लक्षात घेऊन,शेतकरी, दिव्यांग आणि गरीबांसाठी आणखी नवनवीन संशोधन केले जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सरकारच्या हस्तक्षेपामुळे उद्योगांची प्रगती नेहमीच खुंटते यावर भर देत मंत्र्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकात सरकारी हस्तक्षेपामुळे औद्योगिक प्रगती खुंटल्याचे उदाहरण दिले. आज कोणताही युनिकॉर्न केवळ सरकारी पाठिंब्याच्या आधारे या स्थितीपर्यंत पोहोचला नसता, असे ते म्हणाले.
स्टार्ट-अपची रचना उद्योजकांनी तयार केली असेल आणि सरकार केवळ सहाय्यासाठी सुविधा देण्याच्या स्वरूपात असेल तरच पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल, असे त्यांनी सांगितले.
कोवॅक्सिनसारखे काही उपक्रम हे सरकार आणि उद्योग सहकार्याचे उत्तम उदाहरण आहेत असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना गोयल म्हणाले की, भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात परंतु या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीनें शेतकरी, दिव्यांग आणि गरीब यांच्यासाठी अत्यंत किफायतशीर उपायांसह अब्जावधी उद्योजकही आहेत.
पार्श्वभूमी
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजक पार्क, पुणे,स्थापन केले आहे. इतर विविध मंत्रालयांव्यतिरिक्त या पार्कला अलीकडेच स्टार्टअप इंडियाच्या बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात आला आहे.
स्टार्टअप इंडियाचा बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रम हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत एक प्रमुख कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चर, पुणे चे प्रशांत प्रशांत गिरबाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002