व्हीएस न्यूज - 'दुचाकीला कट मारल्याचे सांगून' दोन दुचाकीवरील भामट्यांनी एका तरूणाला एटीएममध्ये जबरदस्तीने नेत 11 हजार 680 रूपये काढण्यास भाग पाडले. रोख रकमेसह मोबाईल असा 29 हजार 680 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. हा प्रकार हिंजवडी येथे 25 नोव्हेंबर रोजी घड़ला.
सिध्दार्थ घोष (वय-27, रा. मुक्ताईनगर, हिंजवडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोष हे 25 नोव्हेंबर रोजी हिंजवडीतील फेज-2 कडे दुचाकीवरून जात होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी घोष यांना कट मारल्याचे सांगून जबरदस्तीने एटीएममध्ये घेवून गेले. 11 हजार 680 रूपये काढण्यास भाग पाडले. तसेच त्यांचा मोबाईलही जबरदस्तीने काढून घेवून 29 हजार 680 रूपयांची लुबाडणूक केली.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - येथील बाजारपेठेतील बॅक ऑफ महाराष्ट्राचे एटीेएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत बॅकेचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर लोणावळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एटीएम मशिनमध्ये किती रोकड होती याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
अभियंत्याची फसवणूक होण्याची दोन दिवसातील दुसरी घटना उघडकीस
व्हीएस न्यूज - एका नामंकित पॉलिसी कंपनीत कामाला लावण्याचे आणि पाच लाख रूपयांची पॉलिसी मॉरगेज कर्ज मंजुर करून देण्याचे अमिष दाखवून तिघांनी एका अभियंता तरुणाची 1 लाख 85 हजार रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी ते 5 ऑक्टोबर या कालावधीत आकुर्डी येथे घडला. दरम्यान, गेल्या दोन दिवसातीस अभियंत्यांना फसवणूक करण्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुलदिप जाधव (वय-28, रा. दत्तवाडी, आकुर्डी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत निगडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांनी माहिती दिली. कुलदिप हा अभियंता आहे. तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. दिल्लीतील तीन आरोपींनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून एका नामांकित पॉलिसी कंपनीत नोकरी लावण्याचे आणि पाच लाख रूपयांचे पॉलीसी मॉरगेज कर्ज मंजुर करून देण्याचे आमिष दाखविले.
या अमिषाला बळी पडून कुलदिपने आरोपींच्या विविध बॅंक खात्यात व पेटीएमव्दारे 1 लाख 85 हजार रूपये भरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोन भामट्यांनी अभियंता तरूणी रेखा अर्जुन (वय-25, रा. थेरगांव) हिला ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून एक लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार थेरगांव येथे मंगळवारीच उघडकीस आला होता.
व्हीएस न्यूज - चिंचवडगावात पीएमपीचे बस स्थानक आहे. एमएच १२ एचबी ४०१ या क्रमाकांची पीएमपीची बस चिंचवड स्थानकात आली होती. स्थानकाबाहेर बस उभी होती. त्यावेळी पावणेदोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली.संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे....Read More
व्हीएस न्यूज - पुण्यात मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शनिवार पेठेत पोटच्या मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पराग क्षीरसागर (वय 30 वर्ष) असं आरोपी मुलाचं नाव आहे.
आज सकाळी ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने वडिलांची गळा चिरुन तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (वय 60 वर्ष) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांच्या हत्येनंतर मुलानेही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलं. मात्र त्याला वाचवण्यात आलं आहे. आरोपीला जुळा भाऊ असून तो देखील घटनेच्या वेळी घरातच होता. आरोपी परागचे आई-वडील नोकरी करत होते. त्याला दारुचं व्यसन होतं. शिवाय तो काही कामही करत नव्हता. त्यातूनच त्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी पराग क्षीरसागरला ताब्यात घेतलं असून विश्रामबाग पोलिस पुढील तपास सुरु आहे.
व्हीएस न्यूज - हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे लागलेल्या आगीत फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे. या आगीत ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. उरुळी कांचन,येथे अशा प्रकारच्या आगीची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून व्यापारी वर्गात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा गंगाराम जगताप (रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांचे नेत्रा फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानाला रात्रीच्या वेळी अचानक आग लागली होती. यावेळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन गाड्या व ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभागाच्या टँकरने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या भीषण आगीत हे फर्निचरचे संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत ९० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशाचप्रकारे साडी डेपो व फर्निचरच्या सात दुकानांना आग लागून साधारणत: दोन कोटींचे नुकसान झाले होते. पंधरा दिवसात या दुसऱ्या आगीच्या घटनेने व्यापारी वर्गात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनेत मध्यरात्रीच्या वेळीच आग लागली असल्याने ही आग लागली की लावली गेली याबाबत शंका उपस्थित होत आहे.
व्हीएस न्यूज - ब्लड कॅन्सर सारखा मोठा आजार, दर दोन महिन्याला बदलावे लागणारे रक्त आणि त्यासाठी प्रचंड महागड्या उपचारासाठी चक्क वयाच्या १७ व्या वर्षापासून घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निगडी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. मुकेश उर्फ मुन्ना उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने (वय-२१, राहणार कोथरुड, पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातल्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी सध्या गस्त वाढवली आहे. ही गस्त सुरू असतानाच निगडी पोलिसांनी मुकेश उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने या २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि पोलिसांना धक्काच बसला. १७ व्या वर्षापासून त्याने घरफोडी करायला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले. घरफोडी आणि इतर असे तब्बल ३२ गुन्हे त्याच्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आणखी तपास केल्यावर तो घरफोड्या का करत होता हे त्याने सांगितले. त्याचे कारण ऐकून पोलीस ही चक्रावले आहेत. मुकेशला ब्लड कॅन्सर असल्याने त्याला दर दोन महिन्याला रक्त बदलावे लागते. एवढे महागडे उपचार करण्यासाठी तो चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. पोलीस आता त्याच्या या दाव्याचा तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - गेल्या काही दिवसांपासून निगडी प्राधिकरणात भरदिवसा घरात घुसून एका चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेतील सराईत चोराला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.
मुकेश उर्फ मुन्ना ऊर्फ धन्या उर्फ धनंजय (वय-21 रा सुटरदरा, कोथरूड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 13 लाख 57 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचा तडीपार गुन्हेगार असून त्याच्यावर 32 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर औवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस पथकाने केली.
व्हीएस न्यूज - मंत्रालयात शिपायाची नोकरी लावतो असे सांगून एका इसमाने चिखलीच्या तरुणाला एक लाख रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे.
हेमंत रासकर (वय-47 रा. विठ्ठलवाडी देहुगाव) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी याकुब देवाशीश पैलवान (वय-22 रा. घरकुल चिखली) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे वडील कस्टममध्ये ऑफीसर आहेत. त्यांच्या ओळखीने मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून आरोपीने याकुब यांच्याकडून मे ते नोव्हेंबर या काळात एक लाख रुपये घेतले. मात्र सहा महिने झाले तरी नोकरी लावली नाही तसेच पैसे मागण्यसाठी गेले असता मारहाण करु अशी धमकीही आरोपीने दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - माहेराहून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ केल्याची आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार एका विवाहितेने केली आहे. याप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत 23 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तिचा विवाह ठाणे येथील तरुणाशी झाला आहे. जानेवारी 2016 पासून माहेरुन पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच पती वारंवार तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. या अत्याचाराला कंटाळून पीडित विवाहिता पिंपरी येथे माहेरी राहण्यास आल्या. छळ असह्य झाल्यानंतर विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा पती, सासू व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - तरूणाबरोबर झालेल्या पुर्वीच्या भांडणातून नऊ जणांच्या टोळक्याने दहशत माजवित तीन मोटारींची तोडफोड केली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी भोसरीतील संभाजीनगर कॉलनीत रात्री आठ वाजता घडली.
गजानन पवार (वय-50, रा. संभाजीनगर भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश तानाजी साबळे (वय-20, रा. आदर्शनगर, दिघी), शुभम देविदास खंदारे (वय18, रा. सावंतनगर, दिघी) या दोघांना पोलीसांनी अटक केली होती. त्यांना जामीनही मंजुर झाला आहे. सनी रामदास भागरे (वय-27, रा. भोसरी) याच्यासह सहा जण फरार आहेत.
याबाबत फौजदार चामले यांनी माहिती दिली. संभाजीनगर येथील एका तरूणाबरोबर आरोपींची भांडणे झाली होती. या भांडणातून नऊ आरोपींनी 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता फिर्यादी व त्यांचे शेजारी संदिप दौंडकर, दत्तात्रय ठाकरे यांच्या मोटारींची लाकडी दांडक्याने तोडफोड केली. परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002