Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
मौजमजेसाठी चोरी करणार्‍या तीन चोरटय़ांना अटक ; निगडी पोलिस तपास पथकाची कामगिरी.

व्हीएस न्युज - मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटरसायकल, मोबाईल फोन, आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

स्वप्निल सिद्धाराम माडेकर (वय 25, रा. आनंदनगर चिंचवड), काशीमाप्पा शरणप्पा म्हेत्रे (वय 22, रा. चाकण. मूळ रा. गुलबर्गा), राजेंद्र गंगाधर फाकटकर (वय 38, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे, पोलिस हवालदार पढेर, पोलीस नाईक मावसकर, ढोले, केकाण आणि पोलीस कॉन्स्टेबल बोडके शहरात गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मावसकर व पोलीस कॉन्स्टेबल राहुल मिसाळ यांना माहिती मिळाली की, दोन मुले रावेत कॉर्नरजवळ थांबले असून त्यांच्याकडे चोरीचा मोबाईल फोन आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक दुचाकी (एम एच 14 / जी झेड 3518), मोबाईल फोन, रोख रक्कम आणि घरफोडीचे साहित्य मिळाले. याबाबत चौकशी केली असता चोरट्यांनी चिंचवड मधील युनिक हॉस्पिटल येथून दोन लाख 47 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन अशी एकूण दोन लाख 57 हजार रुपयांची चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून अधिक चौकशी करून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला देखील अटक केली.

तिन्ही आरोपींकडून मोटारसायकल, मोबाईल फोन, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त केला.

...Read More

V. S. News
आईने केली अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाची हत्या.

व्हीएस न्युज - आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. गौरव ऊर्फ यश प्रकाश चव्हाण (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय २९, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१, रा. बावधन, ता. वाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांना न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेचीवाडीतील वृंदावन कॉलनीतील इयत्ता चौथीत शिकणारा गौरव ऊर्फ यश चव्हाण हा शुक्रवारी (ता. २८) रात्री गंगापुरी यात्रेतील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे पालकांनी त्याचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी आईने वाई पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास देगावच्या हद्दीत जाधव वस्तीजवळ धोम डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही युवकांना आढळला. त्यांनी भुईंज पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, गौरव कसा बेपत्ता झाला, याबाबत त्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता त्यात विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी आईला विश्‍वासात घेतले. त्यावेळी तिने सत्य घटना सांगितली. अश्‍विनी व सचिन हे दोघेही औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरीला होते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अश्‍विनी ही मुलाला घेऊन कार्यक्रम पाहायला गेली होती. त्यावेळी सचिनचा फोन आल्याने दोघेही दुचाकीवरून शाहीर चौकात आले. त्यावेळी सचिनने मुलाला थंडपेयाची बाटली दिली. ती घेतल्यानंतर तिघेही दुचाकीवरून शेलारवाडी रस्त्याला धोम डाव्या कालव्याजवळ पोचले. दुचाकीवरून उतरल्यानंतर गौरवला गुंगीमुळे चालता येत नव्हते. त्यावेळी मुलाला बाटलीतून काय दिले, असा जाब अश्‍विनीने सचिनला विचारला. त्यावर सचिनने तुला आणि नवऱ्यालाही मारून टाकीन, अशी धमकी देत यशला कालव्यात ढकलून दिले. त्याने आईला हाकही मारली परंतु; अश्‍विनी काहीच करू शकली नाही. दोघांनाही आज अटक करण्यात आली. वाईच्या न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत (ता. १३) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर तपास करीत आहेत. पोलिस उपअधीक्षक अजित टिके व पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांनी तपासात मदत केली.

गौरव हा संशयित सचिनवर होता चिडून

सचिन कुंभार हा रात्री-अपरात्री फोन करून आश्‍विनीशी बोलत असे. या वेळी गौरव हा आईच्या कुशीत झोपलेला असे. त्यामुळे त्या दोघांमधील संवाद तो ऐकायचा. सचिन हा अनेक वेळा तिच्या घरी जात असे. त्यावेळी अनेकदा गौरवही तेथे असायचा. त्याचे घरी येणे व आईला फोन करणे हे गौरवला आवडत नसे. एकदा आई घरी नसताना सचिन हा अश्‍विनीच्या घरी आला होता. त्यावेळी गौरवने त्याला रागामध्ये मला आईविषयी काही विचारायचे नाही, असे सुनावले होते. त्यामुळे आरोपी सचिन गौरववर चिडून होता. गौरवमुळे अनैतिक संबंधाचे बिंग फुटेल, याची त्याला भीती होती. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पो. नि. खोबरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

...Read More

V. S. News
पुण्यात साडी सेंटरला भीषण आग, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

व्हीएस न्युज - पुणे - देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपोच्या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. तसेच सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले आहे. राकेश रियाड (वय २२),धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३),रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

पहाटे सव्वा चारच्या दरम्यान या दुकानात आतमध्ये झोपलेल्या कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. आतमध्ये पाच कामगार झोपले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. असा फोन दुकानच्या मॅनेजरला आला. मॅनेजर तेथे जाईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. सुमारे सात हजार स्केअर फुटच्या या दुकानात साडी व रेडीमेड कपड्याचे दालन होते. चार राजस्थानचे तर एक लातूरचा कामगार राहण्याची सोय नसल्याने या दुकानातच आतमध्ये राहत होते.

देवाची ऊरळी येथील राजु भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा टॅंकरने ही आग विझविण्यात आली. सकाळी पावणेसातच्या सुमारास या दुकानामधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

...Read More

V. S. News
दलित माओवादी बनत नसून माओवादीच त्यांचा वापर करीत आहेत : कॅप्टन स्मिता गायकवाड

व्हीएस न्युज - भारतातील माओवादी क्रांतीचे मूळउद्दीष्ट हे भारतीय लोकशाहीला मानणा-या नागरिकांचा बुद्धीभेद करणारे आहे. आदिवासींमधून सकारात्मक विचारांचे नेतृत्व उभे राहत असेल तर नक्षलवादी, माओवादी बंदुकीच्या धाकाने अशा व्यक्तींना संपवत आहेत. दलित माओवादी बनत नसून माओवादीच दलितांचा टार्गेट म्हणून वापर करीत आहे. माओवादी हे दलित समाजात आम्ही आंबेडकरवादी आहोत असे सांगतात आणि दुसरीकडे संविधान नाकारतात, हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमच संसदीय मार्गाचा स्विकार केला आहे. कुठलीही आंबेडकरवादी व्यक्ती माओवाद्यांचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.

चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28वे वर्ष आहे. तिसरे पुष्प गुंफताना कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी उपस्थितांशी स्लाईड-शो व्दारे संवाद साधला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा देव, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, बाळासाहेब ढसाळ, सुहास पोफळे, गीतल गोलांडे, सुजाता पोफळे, शिल्पा वाघुले, हेमा सायकर, कविता शिंदे, प्रा. महादेव रोकडे, विजय भिसे, कैलास बहिरट, राजेंद्र घावटे, दिलीप बोंबले आदी उपस्थित होते.

कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाल्या की, नक्षलवाद किंवा माओवाद हा गेल्या पन्नास वर्षांपासून देशाला पोखरत आहे. यावर अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. नक्षलवाद आता गडचिरोलीपुरता मर्यादित नसून शहरापर्यंत तो फोफावला आहे. 31 डिसेंबर 2017ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर तथाकथित बुद्धीवाद्यांना अटक करण्यात आले. त्यांनतर पुन्हा माओवाद व नक्षलवादावर चर्चा सुरु झाली. नक्षलवाद आणि माओवाद यात फरक नाही. शोषितांच्या, वंचितांच्या हक्कासाठी लढतो असे दाखविणारे हे ‘माओच्या’ विचाराने काम करीत असतात. पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीत 1967ला उठाव झाला. तो प्रत्यक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी होता. हे त्यांच्याच दस्तऐवजामधून दिसते. आदिवासींना जमिनी मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट नसून मतदानाऐवजी बंदुकीच्या जोरावर सत्ता हस्तगत करायची अशी शिकवण माओची आहे. आदिवासींसाठी माओवाद नसून उलट आदिवासी कायम माओवादासाठी वापरले जातात. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर शहरी भागातील अनेकांनी सोशल मिडियातून ‘#मी टू अर्बन नक्सल’ अशी भूमिका घेऊन नक्शलवाद्यांना पाठिंबा दिला. आदिवासी भागामध्ये नोक-या व विकास नाही; म्हणून माओवादी विरोध करतात. तर दुसरीकडे शिक्षित व्यक्ती पोलिस भरती झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ठार करतात. आमदार भिमा मंडावी यांना स्फोटकांचा वापर करून माओवाद्यांनी ठार केले. हे माओवादी समोरासमोर लढत नसून स्फोटकांचा वापर करून निव्वळ संशयावरून नक्सली कारवाया करतात. युगेंद्र मेश्राम या शिक्षकाला केवळ संशयावरून माओवाद्यांनी ठार केले. गाववाल्यांच्या जनमताच्या विरोधामुळे नंतर चूक झाली अशी पत्रके वाटून माफी मागितली. दंतेवाड्यात सीरपीएफच्या प्रशिक्षणार्थींचा बळी घेतला जातो. यातील अनेक जवान हे स्थानिकच आहेत. स्थानिकांच्या हक्कासाठी लढतो म्हणायचे आणि त्यांनाच ठार करायचे हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. माओवाद्यांना स्थानिकांचा विरोध आहे. त्यांचा फोलपणा उथळपणा मागच्या दोन पिढ्यांनी पाहिला आहे. म्हणून स्थानिक आदिवासी त्यांना आता विरोध करीत आहेत. त्यामुळे आदिवासी त्यांच्या मुलांना दूरच्या शाळेत, आश्रमात शिकवत आहेत. आता माओवाद्यांना भरती करण्यासाठी तरूण मिळत नाहीत. ते तेथील शिक्षित तरूणांवर दबाव आणतात. विरोध केला तर ठार करतात. 2012ला पुण्यात बसेसमध्ये माओवाद्यांनी त्यांच्या नेत्यांना साडावे अशी मागणी करीत भगत सिंग यांचा फोटो वापरून पत्रके लावली होती. त्यातून शहरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा माओवाद्यांचा हेतू होता. शहरी माओवाद म्हणजे वेगवेगळ्या संस्था, संघटनांमधून, सांस्कृतिक कार्यक्रम, सभांमधून तरुणांना हेरून नक्षली कारवायांसाठी उद्दिपित केले जाते.

शहरी भागातील माओवाद रोखण्यासाठी नागरिकांना शस्त्र हातात घेण्याची गरज नाही तर पोलिसांचे, सीआरपीएफ जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. अन्यथा गडचिरोली, छत्तीसगड मधील हिंसकता शहरात फोफावेल. माओवाद रोखण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था संवेदनशील आणि लोककेंद्रीत असणे आवश्यक आहे. माओवादी भांडवल करत असलेल्या समस्यांवर उपाययोजना केली पाहिजे. विचारधारेचे हे युद्ध शस्त्रांव्दारे जिंकता येत नाही. शहरी आणि जंगल भागातील माओवादी कारवायांना भिन्न प्रतिसाद आहे. वेगाने अस्तित्वात येणा-या फ्रंट संघटना व कायद्याच्या मर्यादा ही माओवाद रोखण्यापुढील आव्हाने आहेत, असेही कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी सांगितले. शुक्रवारी (10 मे 2019) सायं. 7 वाजता गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगावकर यांचे सती मंदोदरी या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच या वेळी प्रज्ञा पिसोळकर यांना जिजाऊ पुरस्कार, हेमंत वसंत कुंभोजकर यांना क्रांतीवीर चापेकर पुरस्कार आणि कस्तुकरी कल्लपा जमखंडी यांना श्री चिंतामणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रज्ञा पिसोळकर यांना वृक्ष लागवडीचा छंद असून त्या कनेक्टींग या संस्थेत समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. कनेक्टींग ही संस्था आत्महत्या करणा-या व्यक्तीस व आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशनाचे काम करते.

स्वागत कविता शिंदे, तर सुत्रसंचालन सुजाता पोफळे व आभार हेमा सायकर यांनी मानले.

...Read More

V. S. News
मिलिंद एकबोटेंना सासवड येथील झेंडेवाडी येथे मारहाण.

व्हिएस न्युज - समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री साडे नऊच्या सुमारास सासवड येथील झेंडेवाडीमध्ये घडली. याप्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. “पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो”, अशा स्वरूपाची पोस्ट एकबोटेंनी फेसबुकवर लिहिली होती. या रागातून मोडक आणि त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. मोडक यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांची खेड तालुक्यात प्रचारात आघाडी.

व्हीएस न्युज - शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 या लक्षवेधी मतदारसंघातून महाराष्ट्र मजूर पक्षाचे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रामचंद्र अडागळे अडागळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कष्टकरी कामगार, शेतकरी कामगार यांनी गजबजलेल्या महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथील महात्मा फुले नगर येथे मातंग समाज व इतर समाज बांधवांनी जोरदार स्वागत केले व औक्षण करून स्वागत करण्यात आले. महात्मा फुले नगर येथील युवा कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते महिला अबालवृद्धांमध्ये आनंदाचे वातावरण पाहता चाकण शहरात निवडणुकीची कुजबुज सुरू झाली.

खेड तालुक्यातील आळंदी येथील अण्णाभाऊ साठे नगर याठिकाणीही अडागळे यांचे स्वागत करण्यात आले. खेड तालुका मातंग समाजाचे युवा नेते विठ्ठल भाऊ चांदणे, सुनील गालफाडे, रामदास लोंढे, ज्येष्ठ नेते दीपक लांडगे, अनिल जाधव, खेड तालुक्यातील युवा नेते संतोष डुकरे यांनी प्रचारात सहभागी होऊन प्रचाराचा जोर वाढविला आहे. प्रचारात आघाडी असल्याने मातंग समाज व कष्टकरी मजूर आता आनंदाचे वातावरण आहे हे पाहता महाराष्ट्र मजूर पक्ष्याचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२८ वी जयंती निमित्ताने महाराष्ट्र मजूर पक्षातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

व्हीएस न्युज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ वी जयंती निमित्ताने महाराष्ट्र मजूर पक्षातर्फे पिंपरी चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष फारूक कुरेशी, संतोष कसबे, मयूर गायकवाड, सविता आव्हाड, सुरेश मिसळ, मोहन शिंदे, दत्ता सोनावणे, मीना रणदिवे, अनिता रिडलान, जुलिया शीतलानि, रामचंद्र आरडे, आकाश अडागळे, शिवाजी चव्हाण, जालिंदर शेंडगे, त्रिंबक माने, कादीर कुरेशी, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

...Read More

V. S. News
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड करतंय गायींचा कोंडमारा

व्हीएस न्युज - खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने भिंत बांधण्याचे काम हाती घेतल्याने गायी गुरांचा कोंडमारा होऊन हाल होणार आहेत. एकीकडे सरकार गो पालनाचा नारा देत आहे, तर दुसरीकडे मात्र याच गायी मोकळ्या हवेवाचून बंदिस्त होत आहेत. केन्टोन्मेंट प्रशासनाने मुक्या जनावरांचा विचार करून भिंतीचे काम थांबवावे; अन्यथा महामार्गावर गायी आणून रास्ता रोको करू, असा इशारा गवळी समाज व छावा मराठा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीनजीक इंग्रज सरकारने धोबी आणि गवळी समाजासाठी जागा देऊन त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले होते. तेव्हापासून गवळी आणि धोबी समाज आपापले व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. आज या ठिकाणी 70 ते 80 गवळी गोपालन करीत आहेत. सकाळी लवकर उठून गायींच्या गोठ्याची स्वच्छता, गायी धुणे, त्यांना चारा पाणी देणे, दूध काढण्याची कामे करतात. सायंकाळी पुन्हा हेच काम असते. आजपर्यंत गुण्यागोविंदाने जगणारा हा समाज अलिकडे राजकीय लोकांचे लक्ष्य बनत चालला आहे. स्थानिक राजकीय लोकांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. एवढेच नाही तर या गवळी समाजाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असल्याचा आरोप छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी केला.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला हाताशी धरून स्थानिक राजकीय लोकच या ठिकाणी भिंत बांधून घेत आहेत. वस्तुतः या ठिकाणी मोकळे मैदान असून भिंत बांधण्याची आवश्यकता नाही. सध्या इथे भिंत नसल्याने गवळी लोक गायींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. त्यामुळे गायींचे शेण ड्रेनेजलाईनमध्ये जाणे थांबते. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होत आहे. ही भिंत बांधल्यावर गायींच्या गोठ्यात कसलीच हवा जाणार नाही. तसेच गोवऱ्या थापण्यास जागा नसल्याने आणि शेणाची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी जागा नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील शेण ड्रेनेजमध्ये जाणार आहे. त्यामुळे आधीच प्रदूषित असलेले नदीपात्र जास्तच प्रदूषित होणार आहे.

गायी जाण्या-येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. इथूनच गायींसाठी चारा, कडबा घेऊन येणारे वाहन येत असते. याची बोर्ड प्रशासनाला जाणीव असूनही जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कहर म्हणजे या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी रस्ता म्हणून अर्धवर्तुळाकार प्रवेशद्वार बनविण्यात येणार आहे. त्यामुळे गायींना जाता येताना खूपच त्रास होणार आहे. जवळपास 170 ते 180 गायी एक एक असे या प्रवेशद्वारातून जाण्यास वेळही खूप जाणार आहे. गायींसाठी आणण्यात येणारा चारा, कडबा आतमध्ये कसा आणायचा ? एखादी गाय मृत झाल्यास या प्रवेशद्वारातून बाहेर कशी न्यायची ? भिंतीमुळे हवा अडली जाणार असून, मोकळ्या हवेशिवाय गायींचा कोंडमारा होणार नाही का ? इतक्या गायींचे शेण दररोज ड्रेनेजमध्ये जाऊन नदी प्रदूषण होईल, त्याचे काय ? स्थानिक एक दोन राजकीय लोकांच्या हट्टापायी कॅन्टोन्मेंट बोर्ड गायींच्या जीवाशी का खेळत आहे, असे सवाल छावा मराठा संघटनेतर्फे विचारण्यात येत आहेत.

रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने या भिंतीचे काम थांबवावे, अन्यथा जुना पुणे- मुंबई महामार्गावर गायी आणून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या संदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.

छावा मराठा संघटना गवळी समाजाच्या पाठीशी

गवळी समाजावर स्थानिक राजकीय व्यक्तींचा घट्ट पुरविण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अन्याय करत आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, छावा मराठा संघटना गवळी समाजाच्या पाठीशी उभी आहे. सरकार गोपालन करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन मात्र या गोपालनकर्त्यांच्या मुळावर उठले आहे. गायींच्या आरोग्याचा विचार करून इथे होत असलेल्या भिंतीचे काम थांबवावे, अन्यथा गवळी समाजाला सोबत घेऊन छावा मराठा संघटना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे शहर व जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.

...Read More

V. S. News
बुलढाण्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मराठवाडा जनविकास संघातर्फे आर्थिक मदत प्रदान

व्हीएस न्युज - काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाण्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ आणि विजयराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं. चिं. शहर, विजयराज नागरी सहकारी पतसंस्था पिंपळे गुरव आणि लेवा भ्रातृ मंडळ, पिंपळे सौदागर यांच्या संयुक्तपणे मलकापूर (जि. बुलढाणा) येथील जनता कला-वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड यांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंबातील सदस्य, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, मारुती बाणेवार, लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष क्रुष्णाजी खडसे, अमित नाफडे, मलकापूरचे नगराध्यक्ष ऍड. हरीष रावल, दिलीप बढे, बळीराम माळी, डॉ. दिनेश गाडेकर, विजय वडमारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड नितीन राठोड हे ज्या शाळा व महाविद्यालयात शिकले, त्या अनुक्रमे जनता कला व वाणिज्य महाविद्यालय आणि नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना 'सैनिकी शिक्षण आणि त्याद्वारे उपलब्ध करिअरच्या संधी' याबाबत कृष्णाजी खडसे यांनी, तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरच्या संधीबाबत दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शहीद संजयसिंह राजपूत यांचे सुपुत्र जय राजपूत यांनी 'माझ्या भारतमातेचे रक्षण करण्यासाठी मी देखील सैन्यातच भरती होणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पवार यांनी, सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

...Read More

V. S. News
पिंपरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केली जातीयवाचक शिवीगाळ, गुन्हा दाखल ; एफ.आय.आर मधून एकाचे नाव वगळण्याचा पोलिसांचा प्रयत्न?

व्हिएस न्युज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी आणि सचिन सौदाई यांच्या गटात सोमवारी मध्यरात्री पिंपरीतील रात्रभर चालु असणार्‍या सलोनी हॉटेल मध्ये हाणामारी झाली. या बाबत पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

सचिन राकेश सौदाई (३३, रा. पिंपरी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक डब्बू आसवानी, लखु भोजवनी, जीजू, आशिष आसवानी, डब्बू आसवानी यांचा दुसरा मुलगा, सनी सुखेचा, लखन सुखेचा, भरत आसवानी यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, जातीयवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, पण जाणीवपूर्वक एकाचे नाव गुन्ह्यातुन वगळून त्याला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचे सुत्रांमार्फत कळते.

नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी फिर्याद दिल्यानुसार हा प्रकार सलोनी हॉटेल येथे झाला. सनी सौदाई याचा वाढदिवस असल्याने आसवानी यांच्या सलोनी हॉटेलमध्ये सनी सौदाई व इतर आले होते. या ठिकाणी हे जबरदस्तिने दारू आणि बियरचे बॉक्स मागवत होते. यास मनाई केल्याने त्यांनी गोंधळ घातला. याची माहिती मिळाल्यानंतर डब्बू आसवानी हॉटेलवर गेले असता पैसे देऊन घेऊन जा असे म्हटल्याने चिडून टोळक्याने राडा केला. सचिन राकेश सौदाई , सनी राकेश सौदाई , सुनील मुकेश शर्मा (रा. सर्व पिंपरी), अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू व इतर ५ ते ७ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, दरोडा टाकणे, खुनी हल्ला करणे, धमकी देणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

...Read More

V. S. News
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा 'आदर्श माता' व 'समाजभूषण' पुरस्काराने गौरव

व्हीएस न्युज - गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना 'आदर्श माता' आणि 'समाजभूषण' पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात 'आदर्श माता पुरस्कार' देवून विमलबाई धुरगुडे (तुळजापूर, मंगरूळ), शकुंतला पवार (धारूर, मोर्डा तुळजापूर), धन्वंतरी गोजमगुंडे (लातूर), शालिनी चौधरी (अंबाजोगई), द्रोपदी काळे (चारे, बार्शी) यांना गौरविण्यात आले.

यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, परिमंडळ १ पुणेचे उपायुक्त सुहास बावाचे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, उदयपूरचे सरपंच माधवराव पाटील, पूजाताई महेश लांडगे, शुभांगीताई लांडे पाटील, विद्याताई जाधव, आयोजक प्रकाश इंगोले व डी. एस. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. समाजभूषण पुरस्कारार्थी : डॉ. अंबिका पतंगे (स्त्री रोग तज्ज्ञ), स्मार्तना पाटील (पो.उप- आयुक्त परिमंडळ-१ पिं.चिं), प्रतिभाताई कव्हेकर पाटील (लातूर), डॉ. दीपाताई मोरे (उमरगा), अंजली तापडिया (सुवर्ण पदक विजेत्या), प्रीतीताई काळे (समाजसेविका), पूजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी), आशाताई सूर्यवंशी-मुठे, सुरेखा शेडे (समाजसेविका), स्नेहल शहाणे (लोकसेवा फाउंडेशन), ऍड. प्रीती वैद्य (संचालिका किनारा वृद्धाश्रम ), अर्चनाताई अंबुरे –उस्मानाबाद, पोपटबाई जाधव (लघुउद्योजिका), रिंका जाधव- काळे, अदिती साखरे, अनिता खांदवे – कराळे, निताताई मोघे, प्रतीक्षा इंगोले. रवींद्र गायकवाड म्हणाले, पुरस्कारामुळे महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. मराठवाडा ही संताची भूमी आहे व आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिला या आपल्या मराठवाड्याच्या मातीतील आहेत. पिंपरी-चिंचवड ही त्यांची कर्मभूमी असली, तरी आपल्या जन्मभूमीवर तेवढीच माया व प्रेम करतात.

पुरस्कारार्थींचेच्या मनोगतातून सद्यस्थितीत समाजामधील एकमेकांसाठीचा ओलावा आणि संवेदना हरवत चालल्याच्या भावना व्यक्त झाल्या. दरम्यान, “स्वराज्य शांतीदूत परिवार” या संस्थेचे उद्घाटन व स्वराज्य महिला विशेषाकांचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक राजेंद्र कोरे यांनी, तर आभार डी.एस.राठोड यांनी मानले.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड शहरातील ५० जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरातील आज ५० जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला यावेळी सचिन चिखले, नगरसेवक पिं.चिं,सचिन पवार, हेमंत डांगे, शहर अध्यक्ष वि.सेना.पिंपरी .चिंचवड उपस्थित होते.

विक्रम आडे,तेजस देशपाडे ,बिपीन पाल,शुभम महाडिक,ओमकार पाचारणे,श्रीकृष्ण गंगातीर,यश काटे,आकाश आवसरे,अनिकेत वाघमारे, यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!