व्हीएस न्यूज - धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची ताकद महिलांच्या सामूहिक नेतृत्वात असून त्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी नुकतेच केले.
श्री जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्वान महीलांचा व उत्कृष्ट महीला बचतगटांचा सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुलक्षणा धर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. लक्ष्मण रानवडे, ऍड. सुनिता रानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एच. ए. कॉलनीतील स्वरांजली महिला बचत गट, छाया सिनलकर, रंजना मुळिक, सुरेखा कामठे, संस्कृती महिला बचत गट वनमाला वाघमारे यांना जिजाऊ सावित्री उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात आले. तर सायुजता दोडके यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बहल पुढे म्हणाल्या, गेली एकवीस वर्षे महिलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ऍड. रानवडे हे पुरस्कार देऊन करत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या समाजरुपी कार्याची दखल राज्य शासनानेही नुकतीच घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी सुलक्षणा धर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. लक्ष्मण रानवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजिता ऍड. सुनिता रानवडे यांनी आभार मानले. चॉंद शेख, देवेंद्र गावंडे, सुधीर कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002