व्हीएस न्यूज - येथील 11 ते 15 वयोगटातील अमृता विद्यालयातील नऊ शाळकरी मुलींनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चढाईसाठी कोणताही मार्ग नसलेला कातळकडेचा खडतर तैलबेला किल्ला सर केला व तेथे भारताचा तिरंग फडकवला. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे महापालिकेतर्फे महापौर नितीन काळजे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सीमा सावळे, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या आशा धायगुडे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, अमित गावडे, बाळासाहेब ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मान करण्यात आलेल्यांमध्ये चेलूवी ढोकले, वैदही भोंगे, मानसी मगर, आकांक्षा पवार, श्रेया भदे, तानीक्षा पवार, वैष्णवी गवळी, मृणाल ठाकर, सई भालेघरे यांच्यासह मार्गदर्शक एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांचा समावेश होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002