व्हीएस न्यूज - पाकिस्तानात एप्रिल मध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन्स कप साठी भारतीय क्रिकेट संघ पाठविण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे हे सामने पाकिस्तानात होणार का यावरच सवाल निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी या संदर्भात बोलताना म्हणाले की बीसीसीआयने कुठल्याही परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानात सामने खेळणार नाही असे कळविले आहे.
पाक क्रिकेट बोर्डाने या सामन्यांसाठी पूर्ण तयारी केली आहे. मात्र टीम इंडिया सहभागी होणार नसेल तर हे सामने श्रीलंका किंवा बांग्ला देशात खेळवावे लागतील. सर्व देश पाकिस्तानात त्यांच्या टीम पाठवितील अशी अपेक्षा होती. या संदर्भात कोलंबोत एक बैठक घेतली जात असून त्यात हे सामने तसेच आशिया कप सामने संदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.
या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये भारतात आशिया कप खेळला जाणार आहे. त्यात पाकिस्तान सहभागी होणार का नाही याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर घेतला जाईल असेही सांगितले जात आहे. मुंबईवर २००८ साली दहशवादी हल्ला झाल्यानंतर पाक विरुद्ध कोणताही द्विपक्षी सिरीज खेनाल्यास भारताने नकार दिला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002