व्हीएस न्यूज - हिंदू धर्मियांनी 2014 मध्ये मोठ्या आशेने भाजपकडे सत्ता सोपवली. मात्र, मोदी सरकार मुस्लिम धर्मियांचे लांगुलचालन करण्यात दंग आहे. 28 वर्षांपूर्वी आम्ही काश्मिरमधून विस्थापीत झालो. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काश्मिरमध्ये जाता येईल, असे वाटले होते. परंतु, ही आशा फोल ठरली. हुरियत सारख्या फुटीरतावाद्यांशी काश्मिर मधील पीडीपी-भाजप सरकार जवळीक साधत आहे. त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. मोदी सरकार राष्ट्रवादी नसून धृतराष्ट्रवादी आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काश्मिरी विचारवंत सुशिल पंडित यांनी केली.
रहाटणी येथील हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिन आणि शिवजयंती महोत्सवाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंडित यांना 'हिंदू कुलभूषण पुरस्कार- 2018' प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पंडित यांनी काश्मिर प्रश्न आणि देशापुढील इतर अनेक प्रश्न यावर आपले सडेतोड विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. संजिव पुनाळेकर, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक पंडित धर्मवीर आर्य, कार्यक्रमाचे समन्वयक नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेवक कुमार जाधव, प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडिमे, जगदिश वासवानी, अतुल आचार्य, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभूवन, संस्थेचे विश्वस्त सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
पंडित पुढे म्हणाले की, काश्मिर ही शिवशंकराची भूमी असून हिंदू धर्मियांमध्ये या भूमीस अनन्य साधारण महत्त्व आहे. पतंजलिंनी योग विद्येविषयीचे शिक्षण येथेच लिहिले. काश्मिर हे ज्ञानाचे-आस्थेचे केंद्र आहे. आदी शंकराचार्य तपश्चर्यसाठी केरळमधून काश्मिरमध्ये आले होते. बौध्दांनी सहा महिने चिंतन-मनन केल्यानंतर महायानची स्थापना येथेच केली. असे हे काश्मिर सध्या धुमसते आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या अनेक हिंदू कुटुंबांवर अन्यायऱ्अत्याचार, महिलांवर बलात्कार केले. अशा घटनांमुळे येथील हिंदू कुटुंबांना विस्थापीत व्हावे लागले. केवळ दहा ते पंधरा टक्के हिंदू काश्मिरमध्ये वास्तव्यास आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्हाला परत काश्मिरमध्ये जाता येईल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. हिंदुस्थानमध्ये असे होत असेल तर येथील माणूस सुरक्षित नाही, असेच म्हणाले लागेल, असे पंडित म्हणाले.
मानपत्र वाचन ऍड. देविदास शिंदे, स्वागत पंडित धर्मवीर आर्य यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम दंडिमे यांनी तर आभार सुहास पोफळे यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002