डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळा संपन्न
व्हिएस न्युज - मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची व जडणघडणीची जबाबदारी शाळा-कॉलेजबरोबरच पालकांची देखील आहे. कुटुंबात मुलांच्या जडणघडणीसाठी पोषक वातावरण आज कमी होत चालले आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील कॉलेज, पिंपरी यांच्यावतीने आयोजित ‘व्यक्तिमत्व विकास’ विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मलघे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रणजीत पाटील, संयोजक डॉ. श्याम गायकवाड, कुुुलसचिव डी.डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मलघे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कुटुंब, शाळा- महाविद्यालय आणि समाज या तीन घटकांद्वारे होत असते. कुटुंबात पालकांचा मुलांसोबत सुसंवाद असणे गरजेचे असते. मुलांनी देखील मोबाईल, टी.व्ही.चा अतिरिक्त वापर टाळून आई-वडील-बहीण-भावाशी संवाद साधला पाहिजे. आज कुटुंबात संवाद अपुरा होत असल्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होताना दिसतो आहे. शाळा-महाविद्यालात विद्यार्थ्यांना मित्रपरिवार लाभतो. ‘कॉलेज कट्टे’ दिसून येतात. यातून मुलांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन डॉ. मलघे यांनी केले. ते पुढे म्हणाले, की ज्यांना उत्तम भाषण व संभाषण करता येते, ते लोक आपल्या मनातील विचार व भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. अशाच लोकांना समाजात मान्यता लाभू शकते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे त्याचे केवळ दिसणे किंवा रुप नव्हे; तर त्याच्याकडे किती तीव्र बुद्धीमत्ता, आचार विचार आणि समाजाशी किती नाळ जुळलेली आहे, यावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची गणना होत असते. देशात-परदेशात ज्या ज्या व्यक्तींनी छाप पाडली, ते सर्व लोक विद्वान होते. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, मोरारजी देसाई, डॉ. राजेंद्रप्रसाद हे सारे लोक बुद्धीमान होते. त्यांनी नवा समाज घडवला. त्याचे कारण त्यांचे विचारशील व्यक्तिमत्व. अनेक उदाहरणे देत डॉ. मलघे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी केली. डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले, की विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, त्याला आज पुढे जाण्यासाठी चांगले बोलणे, चालणे, व्यासंग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या खर्या गुणांची कदर म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व होय. डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002