व्हीएस न्यूज - न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या श्रेयस अय्यरने रणजी सामन्यात सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. रणजी सामन्यात मुंबईकडून खेळणाऱ्या श्रेयसने तामिळनाडूविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने २१ वर्षापूर्वी केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यातील अपयशानंतर रणजी सामन्यात त्याने पुन्हा एकदा धमाका केला. वांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानात मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयसने १२४ चेंडूत १३८ धावांची दमदार खेळी केली. चांगल्या लयीत खेळत असताना तो धावबाद झाला. धावबाद झाल्यामुळे मोठा विक्रम करण्याची अय्यरची संधी हुकली असली तरी रणजीच्या इतिहासात मुंबईकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या सचिनच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने १९९६ मध्ये रणजी सामन्यात एका डावात ९ षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता.
रणजी सामन्यात मुंबईकडून सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा माजी क्रिकेटर आणि भारताचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावे आहे. त्यांनी १९८५ मध्ये बडोद्याविरुद्धच्या सामन्यात १२३ चेंडूत नाबाद २०० धावांची खेळी केली होती. यात त्यांनी १३ षटकार मारले होते. याच सामन्यात शास्त्रींनी एका षटकात सहा षटकार खेचले होते. भारत- न्यूझीलंड यांच्यात १ नोव्हेंबरला दिल्लीत, ४ नोव्हेंबरला राजकोटमध्ये आणि ७ नोव्हेंबरला थिरुवनंतपूरला टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. रणजीतील वादळी खेळी श्रेयसला या सामन्यात टीम इलेव्हनमध्ये स्थान देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002