व्हीएस न्यूज – जी स्थिती जम्मू काश्मीरमध्ये आहे, सिमापरिसरातील पाकिस्तानी दहशतवादी त्यासाठी जबाबदार आहेत. फक्त दंडुक्याची भाषा या दहशतवाद्यांना कळते, दुसरी भाषा कळत नाही आणि आपले सैनिक मेहनतीने आणि कष्टाने त्यांच्यावर शक्तीच्या दंड्याद्वारे अंकुश ठेवत असल्याचे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गेल्या काही दिवसात सिमाभागात भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले.
त्यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये तोडफोड करणाऱ्यांनी ती आपली संपत्ती आहे, अशी भावना रुजवण्यासाठी सरकारला तसे व्हावे लागेल, असे म्हणत मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या भाजप-पीडीपी सरकारचेही कान टोचले. नागपुरात एका महोत्सवाचे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विविध भागांच्या माहितीसाठी आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात हा महोत्सव जम्मू काश्मीर अध्ययन केंद्राच्या माध्य़मातून १५ ते १८ मार्च दरम्यान आहे. या महोत्सवाचे आज संघप्रमुख मोहन भागवत यांनी उद्घाटन केले. यावेळी ते जम्मू काश्मीरबाबत विविध विषयांवर ते बोलले. जम्मू काश्मीरला समस्या म्हणणे चुकीचे असून, ज्याला आपण समस्या म्हणतो ती संपूर्ण भारताची समस्या आहे असंही ते म्हणाले. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002