व्हीएस न्यूज - आपल्या न्याय मागण्यासाठी नाशिक ते मुंबईतील विधानभवनावर २०० किलो मीटर लांबचा पल्ला पायीवारी करून मोर्चा काढणा-या शेतक-यांना भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवाद्याची उपमा दिली आहे. शेतक-यांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे विधान अत्यंत निषेधार्ह असून महाजन यांनी शेतक-यांचा अवमान केले आहे. त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वर्षा जगताप यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय मागण्यासाठी लोकशाही पद्धतीने नाशिक ते मुंबईतील विधानभवनावर २०० किलो मीटर लांबचा पल्ला पायीवरी करून मोर्चा काढला. या मोर्चात महिला, ज्येष्ठ नागरिक उन्हाची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असताना या मोर्चेक-यांना सत्ताधारी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवादीची उपमा दिली आहे.
शेतक-यांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरी माओवाद शेतकरी आंदोलनातून डोकावत असल्याचे, संतापजनक विधान त्यांनी केले आहे. महाजन यांनी राज्यातील बळीराजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी. त्यांच्या वक्तव्याच्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करत आहे. राज्य सरकार हे शेतकरी कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देणे, शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून शेतक-यांची चेष्टा करत आहे. भाजप सरकारला गर्दी व आंदोलन केल्यानंतरच नेहमी जाग येणार का?सरकार म्हणून काय नैतिक जबाबदारी आहे की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002