व्हीएस न्यूज – पदवी ही शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे फलित असून पदवीधारकांनी व्यापक नीतीमूल्यांच्या भानाने सतत जागरुक राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तमराव जाधव, शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल साळुंखे, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलासकुमार पगारिया, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्रा. पांडुरंग भास्कर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.हनुमंत शिंदे, डॉ. ललितकुमार धोका, डॉ.प्रशांत गदिया, कल्पेश पगारिया आदी उपस्थित होते.
राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत, डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम यांनी ध्वजसंचलन केले. प्रा. प्रवीण म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले, डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002