व्हीएस न्यूज - संरसंघचालक मोहन भागवत यांनी सोशल मीडियामुळे माणूस आत्मकेंद्री आणि अहंकारी होतो, असे मत मांडले आहे. सोशल मीडियापासून मी सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे असून दुष्परिणामांमुळेच लांब असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत नागपूरमध्ये झालेली प्रतिनीधी सभा, सोशल मीडिया, संघाच्या शाखा अशा विविध विषयांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडले. तुम्ही अॅप्स, सोशल मीडियाकडे कसे बघता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. भागवत यावर म्हणाले की, ते एक उपयोगी साधन आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे, पण एका मर्यादेपर्यंत. तुम्ही त्याचा वापर संघटनेत एक सुविधा म्हणून करु शकता. पण सोशल मीडियाचा वापर करताना आधी त्याचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही सोशल मीडियामुळे आत्मकेंद्रीत आणि अहंकारी बनता. ‘मी’पणा तुमच्या प्रत्येक गोष्टीत झळकू लागतो. समाजाचा मी एक भाग असून समाजासाठी थांबण्याची गरज नसल्याची भावना मनात येते. फेसबुक तर अगदी ‘फेस’च आहे, असे त्यांनी सांगितले. संघाचे फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट आहे. पण माझे नाही. ना भविष्यातही मी सोशल मीडियावर येईन. राजकारणातील मंडळींना फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट जास्त उपयुक्त ठरते. पण त्याचा वापर करताना त्यांना सावधही राहावे लागते, असे त्यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002