व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी आखलेल्या योजनांचा फायदा फक्त श्रीमंत शेतकऱ्यांनाच होत असून खरे लाभार्थी त्यापासून वंचितच राहत आहेत, असे संघाशी संबंधित असलेल्या भारतीय किसान संघ (बीकेएस) या संस्थेने म्हटले आहे.
बीकेएस संघटनेचे देशभरात सुमारे 20 लाख सदस्य आहेत. संघटनेची बैठक गेल्या आठवड्यात नागपूर येथे झाली. त्यावेळी संघटनेने ही गोष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कानावर घातली. ऑपरेशन ग्रीन या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना एलपीजी सिलिंडरप्रमाणे म्हणजे थेट खात्यात पैसे जमा करून द्यावा, असे किसान संघाने म्हटले आहे. सरकारने कर्जमाफी देण्यापूर्वी पुनर्विचार करावा, कारण खऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्याचा फायदा केवळ श्रीमंत शेतकऱ्यांना होतो आणि ज्यांना या माफीची खरी गरज आहे त्यांना कर्जासाठी पात्र समजण्यात येत नाही, असे किसान संघाच्या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकरी पुढच्या वेळेस कर्ज परत फेडण्यास टाळाटाळ करतात आणि त्यामुळे सरकारी योजनांसाठी ते अपात्र ठरतात, असे किसान संघाने म्हटले आहे.
किसान संघाने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुरू केलेल्या अनेक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मात्र या योजनांचा फायदा व्यापाऱ्यांनाच जास्त होईल असेही बजावले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002