व्हीएस न्यूज – २३ मार्च हा दिवस भाजपसाठी खास ठरला असून या पक्षाने शुक्रवारी राज्यसभेच्या १२ जागा जिंकल्या आहेत. भाजप आता या विजयामुळे राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यातच हा विजय या सर्वांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही खूप महत्वाचा ठरला. त्यांनी पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेतल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभेच्या ७ राज्यातील २६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. यापैकी १२ जागांवर कमळ फुलले आहे. भाजपचे उत्तर प्रदेशमधील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे आता राज्यसभेत ७३ खासदार झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील नववी जागा ही अतिरिक्त होती. उत्तर प्रदेशच्या राजकारणात या जागेवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. बसपा, सपा आणि काँग्रेसने एकमेकांवर क्रॉस व्होटिंगचा आरोप केल्याचे दिसते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निवडणुकीच्या यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला. बसपाच्या उमेदवाराला सपाची अतिरिक्त मते गेली नाहीत. बसपासाठी हा एक मोठा धडा होऊ शकतो. लोकांनी सपाचा स्वार्थी चेहरा पाहिला आहे. समाजवादी पक्ष घेऊ शकतो, देऊ शकत नाही, असे म्हणत टोला लगावला. भाजपच्या ९ उमेदवारांचा राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधून विजय झाला आहे. यामध्ये अमर जेटली, जीव्हीएल नरसिंहा राव, अनिल जैन, डॉ. अशोक वाजपेयी, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, हरनाथसिंह यादव, अनिल अग्रवाल आणि कांता कर्दम यांचा समावेश आहे.
गोरखपूर आणि फुलपूर येथे समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत अनपेक्षितरत्या भाजपचा पराभव केला होता. गोरखपूर हा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा तर फुलपूर हा उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ होता. त्यामुळे भाजपमध्ये थोडे नैराश्याचे वातावरण आले होते. परंतु, राज्यसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य पसरल्याचे दिसून येत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002