महाराष्ट्र सरकारने जारी केली प्लास्टिक बंदीची अधिसूचना
मुंबई
2018-03-25
व्हीएस न्यूज - राज्यातील प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे असून यानुसार येत्या एक महिन्यात प्लास्टिक उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांना प्लास्टिक नष्ट करावे लागणार आहे.
पण औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक तसेच वन फलोत्पादनासाठी, कृषी आणि घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आळे आहे. तर दुधाची पिशवी दूध डेअरी, वितरक आणि विक्रेत्यांनाच पुन्हा खरेदी कराव्या लागतील. शनिवारपासून राज्यभरात निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत.
प्लास्टिक कलेक्शन पॉईंट्स ग्राहकांकडून प्लास्टिक संकलन करण्यासाठी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उत्पादक आणि व्यापाऱ्यांना रिसायकल करण्याची सक्ती करण्यात आली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक तसेच थर्माकॉल वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर २३ मार्चच्या रात्रीपासून सरकारने अधिसूचना जारी केली.