व्हीएस न्यूज – आपल्या ५० टक्क्यांहून जास्त लोकसभा खासदारांचा पत्ता भारतीय जनता पक्ष कट करु शकते. हा निर्णय भाजप खासदारांनी आपल्या मतदारसंघ आणि सभागृहात केलेल्या कामगिरी तसेच सोशल मीडियावरील उपस्थितीच्या आधारावर घेतला जाऊ शकतो. एका ज्येष्ठ भाजप नेत्याने ‘द वीक’ सोबत केलेल्या चर्चेमध्ये सांगितले आहे की, लोकसभा खासदारांच्या कामगिरीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा दोघेही घेत असून ते खासदारांच्या कामगिरीवर असंतृष्ट आहेत. २०१९च्या निवडणुकीवेळी उमेदवारांची निवड कामगिरीच्या आधारावरच केली जाणार आहे.
पूर्व भारतात भाजपचे निवडणूक धोरण आखण्यात महत्त्वची भूमिका बजावणा-या या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ज्येष्ठ नेत्यांसोबत मिळून पक्ष खासदारांची भेट घेतली. त्यांनी यावेळी खासदारांना स्पष्टपणे कामगिरी केली नसेल, तर तिकीट मिळेल याची आशा ठेवू नका असे सांगितले आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारांची निवड करण्यासाठी काही अटी ठेवल्या असून त्यानुसारच तिकीट वाटप केले जाणार आहे.
याबाबत भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे ज्यांनी आपल्या मतदारसंघात भरघोस काम केले आहे. त्याचबरोबर आपल्या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय योजना योग्य पद्धतीने लागू केल्या आहेत आणि सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह आहेत अशांनाच प्राथमिकता दिली जाणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असण्याचा अर्थ म्हणजे त्याचे लाखांमध्ये फॉलोअर्स आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002