व्हीएस न्यूज - आता एप्रिल महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार होणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकारांना दिल्यामुळे संभाव्य नावांच्या चर्चेबरोबर कोणाकोणाला डच्चू मिळणार याचेही आडाखे बांधले जात आहेत.
केंद्र व राज्यातील भाजप प्रणीत सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे हा कदाचित निवडणुकीपूर्वीचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. या वेळी मंत्रिमंडळात आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. जागावाटपानुसार भाजपकडे ३० तर शिवसेनेकडे १२ मंत्रीपदे येतात. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे. त्यामुळे हा विस्तार फक्त भाजपचाच असेल. त्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो.