व्हीएस न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने रामलीला मैदानावर बूट भिरकवल्याचा प्रकार समोर आला आहे. अण्णांनी मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री यावेळी व्यासपीठावरून भाषण करत असताना हा प्रकार घडला. अण्णा हजारे यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर आंदोलन सुरू केले होते. अण्णांनी आपले केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय कृषी राज्यमंत्री केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि अण्णा हजारे यांचे ध्येय एक असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकार लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती करण्यासाठी पुढाकार घेईल असे आश्वासन अण्णांना दिले. यावेळी मुख्यमंत्री बोलत असताना उपस्थितांमधून एकाने बूट व्यासपीठाच्या दिशेने भिरकावल्यामुळे व्यासपीठावर काही काळ चलबिचल झाली. पण त्याकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002