व्हीएस न्यूज – माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यात तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे; असा आरोप करत शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्राने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावे, असे मत व्यक्त केले. शरद पवार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमासाठी सोलापुरात आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
पवार यावेळी बोलताना म्हणाले, की राज्यातील अनेक जिल्हा बँकेच्या नोटाबंदीमधील नोटा अद्याप बदलून दिल्या नाहीत. कर्जमाफी हा निर्णय योग्य असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. ७१ हजार कोटींची कर्जमाफीचा निर्णय युपीए सरकारच्या काळात आम्ही जाहीर केला. या निर्णयाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६०० कोटींचा फायदा झाल्यामुळे शेतकऱ्याला उभारी मिळाली. सध्या शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात ४२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, की युपीए सरकार असताना, पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या काळात दरवर्षी ३ लाख तर शेवटच्या २ वर्षाच्या काळात ५ लाख ८० हजार वार्षिक नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या मात्र वार्षिक कोटींचे आकडे सांगणारे सध्या नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002