कुटूंबात गैरसमज निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ – डॉ.सरोदे
पिंपरी चिंचवड
2018-04-06
व्हीएस न्यूज - टिव्ही, मोबाईलमुळे कुटूंबात संवाद दिवसेंदिवस कमी होत आहे. कुटूंबात वादावादी, गैरसमज निर्माण होण्याचे प्रमाण वाढले असून कौटुंबिक समस्यांवर मानसोपचारतज्ञ उत्तम मार्गदर्शक ठरत आहेत, असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. भारत सरोदे यांनी व्यक्त केले.
मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेमध्ये 'कौटुंबिक स्नेहबंध' या विषयावर डॉ. सरोदे पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस सरोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्याख्यानमालेचे आयोजक बी. आर. माडगुळकर, आर. आर आपटे उपस्थित होते. प्रिती देशपांडे,सिंधु खंडीशळे यांनी 'साबरमती के संत तूने कर दिया कमाल' हे गीत सादर केले. लोकरंजन, लोकप्रबोधन आणि लोकप्रतिवर्तन या हेतून महात्मा गांधी व्याख्यानमालेचे गेल्या सात वर्षांपासून आयोजन करण्यात येत असल्याचे बी. आर माडूगळकर यांनी सांगितले. उल्हास झिरपे यांनी आभार मानले.