व्हीएस न्यूज - नवी सांगवीतील 20 जेष्ठ नागरिक दररोज सकाळी पहाटे साडेचारपासून फेमस चौक, शिवनेरी चौक, एम के चौक, गोविंद गार्डन, कोकणे चौकापर्यंत आठ किलो मीटरचा पायी प्रवास करतात. वाटेने गौळणी, भारुडे, खंडोबाची गाणी, देवीची गाणी, अभंग टाळ्या वाजवत चालत जातात.
आजच्या धकाधकीच्या जीवन शैलीमुळे बैठे कामाची सवय, मानसिक ताण तणाव यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. वयाच्या पन्नाशीतच अनेकांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. याचे गांभीर्य लक्षात घेवून 20 ज्येष्ठ नागरिक "हरिनाम गजरात नाही भय चिंता, ऐसें बोले गीता भागवत, या प्रमाणे लवकर उठून भगवंताचे नामस्मरण करत आम्ही चालतो असे आप्पाजी चव्हान यांनी सांगितले. गेल्या 15 वर्षा पासून नित्यनियमाने चालत असतांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जय श्रीराम म्हणून नमस्कार घालतो. सर्व महिला व पुरुषही आम्हाला नमस्कार घालत असल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
यामध्ये बाबू चौधरी, जे. डी. पाटील, प्रमोद हींगाण, रघुनाथ कदम, अंबादास शहाने, हरीचंद्र ढिगळे, लिंबाजी थिटे, सदाशिव सावंत, वसंत पाटील, बाबु जंगम, जयसिंग पाटील, विठ्ठल देवकर, शिवानंद तालिकोटी, सूरेश कोंडाळकर, अंबादास शहाणे आदी ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002