व्हीएस न्युज - खोटी बातमी दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द करण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढला होता. मग खोटी, फेक आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिपदे रद्द का होऊ नयेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकार सत्तेवर येण्यापुर्वी अच्छे दिन आने वाले है, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करने वाले है, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारस लागू केल्या जातील. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यात येईल, दोन कोटीबेरोजगारांना नोकऱ्या देण्यात येतील, अशी अऩेक खोटी आश्वासने देऊन मोदींनी सत्ता काबिज केली. महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तर दोन वर्षात पाच वेळा 24 हजार शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात फक्त आणि फक्त खोट्या घोषणा केल्या. त्यामुळे खोट्याबातम्या देणाऱ्या पत्रकाराची मान्यता रद्द करण्याचा कायदा करता तर मग खोटी आश्वासने दिल्यास मंत्रिपदही रद्द करण्याची मागणी बकाल यांनी केली आहे.