व्हीएस न्यूज - प्लॅस्टिक बंदीनंतर अवघ्या १२ दिवसातच पहिला बदल करण्यात आला असून या बंदीतून पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली असून १ एप्रिलपासून राज्यभरात प्लास्टिक व थर्माकोल बंदी केली. त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचाही समावेश होता. या बाटल्या पीईटी व पीईटीई प्रकारच्या कच्च्या मालापासून बनविलेल्या असतात. यांचा उपयोग पाणी, खाद्यतेल, सरबते यांच्या साठवणुकीसाठी होतो. अटींच्या आधारे राज्य सरकारने बाटल्यांवरील बंदी मागे घेतली.
महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी महासंघाने बाटल्यांना बंदीतून मुक्त करण्यासंबंधी विषय उचलला होता. पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर शक्य असतो. खाद्यतेलासाठी या बाटल्यांचा मोठा उपयोग होतो. आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खाद्यतेल साठवणूक बंदीमुळे कठीण होईल, हे त्यांनाही पटले. त्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिली आहे. ती घेताना लावलेल्या अटींची पूर्तता तीन महिन्यांत करायची आहे. त्यासाठी आता प्रयत्न केला जाईल. ज्या प्लास्टिकवर राज्यात बंदी आणली आहे, त्याचा व्यवसाय वार्षिक ५ हजार कोटींचा आहे. त्यापैकी २२ ते २५ टक्के व्यावसाय हा पीईटी बाटल्यांचा आहे. या निर्णयामुळे आता १,००० ते १२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाला संजीवनी मिळाली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002