व्हीएस न्यूज - लिंगायत समाज हा संयमी आणि शांतताप्रिय आहे. लिंगायत धर्माची मुळ तत्वे ही लोकशाही मूल्यांवर आधारलेली असून स्वातंत्र्य, समता आणि बंधूता याचा हा समाज पुरस्कर्ता आहे. बाराव्य शतकात थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांनी समाजक्रांती घडवली. अठरापगड जातीच्या लोकांना एकाच छताखाली आणून लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लिंगायत धर्म मान्येता देऊन समाजाला न्याय देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी केली आहे.