व्हीएस न्यूज – अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. संविधानाने त्यांना दिलेला तो अधिकार असल्याचे सांगत चौकशीनंतरही छगन भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे म्हटले आहे. भुजबळांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तुरुंगात आमचा विकास कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नसल्याचे गाऱ्हाणे त्यांनी ठाकरेंसमोर मांडले. भुजबळांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे राज ठाकरे त्यावर म्हणाले होते, असा संदर्भ आंबेडकर यांनी दिला. सरसंघचालकाच्या ‘संविधान बदलले पाहिजे’ या वक्तव्याचे मोदींनी खंडन न केल्यामुळे त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नौटंकी आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथे मोदींनी बाबासाहेबांमुळेच आपण पंतप्रधान होऊ शकलो, असे म्हटले होते. दरम्यान, सरसंघचालक खोटारडे असून त्यांच्याविषयी काहीच बोलायचे नसल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002