व्हीएस न्यूज - खासगी प्रवासी वाहने सणासुदी, सुट्यांच्या काळात राज्यातील तिकीट दर वाढवून प्रवाशांची सर्रास लूट करतात. अव्वाच्यासव्वा प्रवास भाडे प्रवाशांची अडवणूक करून आकारणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना आता चाप लावला जाणार आहे. राज्य शासनाने मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येईल असा निर्णय घेतला आहे,पण यापेक्षा जास्त भाड आकारुन प्रवाशांची अडवणूक करणा-यांविरोधात आता प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना आपली तक्रार मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवता येणार आहे.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार तातडीने योग्य चौकशी करण्यात येईल. जास्त भाडे संबंधित खासगी वाहनांनी आकारल्याचे स्पष्ट झाल्यास, कंत्राटी बस परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. १८००२२०११० या निशुल्क टोल फ्री क्रमांकावरही मुंबईकर तक्रारी नोंदवू शकतात. ऑनलाइन तक्रारदेखील नोंदविता येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002