व्हिएस न्यूज - भोसरीतील टेल्को रस्त्यावर थरमॅक्स कंपनीसमोर जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची नासाडी सुरू आहे. जलवाहिनी त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
टेल्को रस्त्यालगत मागील दोन महिन्यांपासून या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. लाखो लिटर पाणी रात्रंदिवस वाया जाते. थरमॅक्स कंपनीतील कर्मचारी दशरथ शितोळे यांनी याबाबत महापालिका व एमआयडीसीकडे तक्रार केली. परंतु, दोन्ही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. नंतर मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता कल्पेश लाहीवाल व पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली.
महापालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गळतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. परंतु, जवळत विद्यूत खांब असल्याने दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले. त्याप्रमाणे विद्यूत विभागाला खांब काढण्याबाबत पत्र देण्यात आले. मात्र, तो खांब निघाल्याशिवाय गळती थांबू शकत नसल्याने मोठ्या प्रमाणे पाण्याची नासाडी होत आहे. याकडे महापालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही नासाडी होत असल्याचे जोगदंड, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, ऍड. सचिन काळे यांनी म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002