व्हीएस न्यूज - देशात सध्या भयंकर वातावरण निर्माण झाले असून धर्मनिरपेक्षतता संकटात सापडल्याचं सांगत ही परिस्थिती बदलण्यासाठी सगळ्या ख्रिस्ती बांधवांनी उपवास करावा असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप आनिल जोसेफ थॉमस काउटो यांनी ख्रिस्ती बांधवांना केले आहे. थॉमस यांच्या या आवाहना नंतर राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील भाजप सरकारने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आर्चबिशप आनिल यांनी दिल्लीतील सर्व चर्चं व पादरींना पत्र पाठवले आहेत. आपण सध्या एका विचित्र राजकीय अस्थिरतेमधून जात आहोत. ज्यामुळे आपल्या लोकशाहीच्या मूल्यांवरच गदा आली आहे. तसेच देशाची धर्मनिरपेक्ष छवीही धोक्यात आली आहे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच २०१९ साली होणाऱ्या निवडणूकां डोळ्यासमोर ठेवून नेत्यांसाठी व्रत करण्याचे आवाहनही अनिल यांनी केले आहे.
दरम्यान, दिल्ली आर्चबिशपचे सचिव फादर रॉबिन्सन यांनी आर्चबिशपचे पत्र राजकीय किंवा पंतप्रधानांविरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ते एक प्रार्थनेचे निमंत्रण असून अशी अनेक पत्रं यापूर्वीही लिहण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान जाती व धर्माची बंधने तोडून भेदभाव न करता सगळ्यांच्या विकासासाठी काम करत आहेत. यामुळे आर्चबिशप यांनी प्रगतिशील मानसिकतेवर विचार करावा असे त्यांना सांगावेसे वाटते. असे नकवी यांनी म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002