व्हीएस न्यूज - शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका’ असं ट्विट करत सामान्यांचा रोष ओढवून घेतलेल्या अभिनेत्री रविना टंडनने आता यु-टर्न घेतला आहे. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता, मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे, जे शेतकरी असल्याचं नाटक करत आहेत त्यांनाच अटक करा असं मी म्हणाले होते’ अशी सारवासारव रवीनानं केली आहे.
‘मी अनेक स्वयंसेवी संस्थामध्ये काम केलं आहे, अनेक ठिकाणी फिरले आहे. आजही आपल्या देशात लहान मुलं योग्य आहार न मिळाल्यानं कुपोषित आहेत. उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे अशी परिस्थिती देशात असताना आंदोलनाच्या नावाखाली फळं , भाज्या, दूध यांची नासाडी करणं मला पटत नाही त्यातून आपण कित्येक लोकांची भूक भागवू शकतो’ असं स्पष्टीकरण वादानंतर रवीनानं दिलं आहे.
१ जूनपासून कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव यासारख्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. आपल्या मागण्यांसाठी राज्यातीलच नाही तर देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रविनानं ट्विट करत वादाला तोंड फोडलं होतं. ‘आंदोलन करताना शेतकरी शेतमालाची नासाडी करतात, आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते त्यामुळे तातडीने आंदोलक शेतकऱ्यांना अटक केले जावे आणि त्यांना जामीनही दिला जाऊ नये असं रविना टंडननं ट्विट करून म्हटलं होतं. तिच्या या ट्विटवर सोशल मीडियावर सडकून टीका करण्यात आली होती.
एखाद्या महिलेने गरीब शेतकऱ्यांविषयी असे विधान करून त्यांची चेष्ठा केली आहे. हे पाहून अत्यंत वाईट वाटले असून सरकारची किती लांगूलचालन करायची हे रवीना टंडन यांच्या विधानातून दिसत आहे, अशा शब्दात रविना टंडन हिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेसुप्रिया सुळे यांनीही सुनावलं.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002