व्हीएस न्यूज - मान्सूनच्या पावसाची मावळ तालुक्यात जोरदार सुरुवात सुरुवात झाली असून खरीप पिकांच्यासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
मावळ तालुका अतिपावसाचा तालुका असून मावळात प्राधान्याने खरीप पिकेच घेतली जातात. तालुक्यातील 30 हजार एकर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. पावसाची दमदार सुरुवात झाल्याने भात पिकांच्या लागवडीना चांगलाच वेग येणार आहे.
मान्सून पावसाचा जोर पश्चिम पट्यात जास्त असून त्या ठिकाणी भाताच्या पिकांना याचा फायदा होत आहे. मान्सूनच्या पावसाने यावेळी वेळेपूर्वीच सुरुवात केली होती. मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली होती. मात्र रविवार, सोमवार पासून पावसाचे पुन्हा पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.
मावळच्या पूर्व पट्यातही पावसाचे आगमन झालेले असल्याने खरीप भात पिक तसेच भुईमुग, कडधान्ये, आदी खरीप पिकांच्या पेरण्यांना चांगले वातावरण आहे. मान्सूनच्या पावसाने तालुक्यातील जलसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. शनिवार आणि रविवार जोडून सुट्या आल्याने मावळत वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. पर्यटक दुचाकी आणि चारचाकी गाड्यामधून आल्याने काही महत्वाच्या पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी झाली होती.
मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाल्याने पश्चिम पट्ट्यातील डोंगरी भागात ओढे, नाले, धबधबे भरभरून वाहू लागल्याने पुणे मुंबई कडील पर्यटकांनी मावळात वर्षाविहारासाठी मोठी गर्दी केली होती.
पुणे मुंबई महामार्ग या पर्यटकांनी फुलून गेला होता. महामार्गावरील धबध्ब्यावरहि प्रचंड गर्दी झाली होती. चहा, कॉफी, नाष्टा, भोजन करण्यासाठी पर्यटकांना वाट पहावी लागत होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002