अटलबिहारी वाजपेयी यांना युवराज दाखले यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि आखेरचा जय महाराष्ट्र
पिंपरी
2018-08-16
व्हीएस न्युज - शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाकडुन मा.अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना आखेरचा जय महाराष्ट्र करित युवराज दाखले म्हणाले कि "आदणीॕय माजी पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. एक कवी मनाचे पर॔तु तरीही कणखर, एका पक्षाचे तरीही सर्व पक्षीयांच्या हृदयामध्ये स्थान असलेले एक विलोभनीय व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. खरंच एका काळाचा अंत झाला आहे...
अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त आघाडी चे सरकार कसे चालवावे याचे उत्कृष्ट उदाहरण 1999 ते 2004 या काळात देशासाठी अर्पण करून दिले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या मताचाही त्यांनी कायम आदर केला. देशातील सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी त्यांनी कायम प्राथमिकता दिली. आजच्या विध्वंसक व द्वेषाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्वव्यापी राजकारणाची कमी कायम जाणवत राहील. त्यांच्या निधनाने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे."