व्हीएस न्युज - क्रोधावर नियंत्रण मिळवायचे असेल तर, नामस्मरण, तप आणि साधना आवश्यक आहे. शांततेचा, समाधानाचा मार्ग काम, क्रोधावर मात केल्याने सापडतो. आई वडीलांचा त्याग आणि कष्टामुळेच आपल्याला समाजात ‘ओळख’ मिळालेली असते. शिक्षण, संपत्तीने तुम्ही कितीही मोठे झाला तरी आई वडीलांपेक्षा कोणीही मोठे होत नाही. आपल्याला भावी काळात मुला-सुनांकडून मानसन्मान मिळावा अशी अपेक्षा असेल तर प्रथम आपल्या आई वडील, सासू सास-यांचा मानसन्मान ठेवा आणि तसेच संस्कार आपल्या मुलांवर करा, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.
निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.
प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, घर, व्यवसाय, व्यवहार बदलून जीवन बदलत नाही, तर स्वभावात बदल केला की जीवनात बदल घडेल. पाश्चात्य संस्कृतिच्या आकर्षणापायी फॅशनच्या नावाखाली कपड्यांची मॅचिंग करण्याऐवजी अंत:करणपूर्वक कुटुंबातील इतरांच्याबरोबर स्वत:ला मॅच केले तर जीवनभर सुखाची प्राप्ती होईल, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी म्हणाल्या.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002