व्हीएस न्युज - अनुभव नसताना अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल विमानाचा करार का देण्यात आला ? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. वर्ध्यातील सेवाग्राममधील सभेत बोलताना राफेल करारावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी लोकांना तुम्ही नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आणून पाहिलंत. मात्र आता त्यांची गाडी पंक्चर झाली आहे अशा शब्दांत टीका केली.
अनिल अंबानी यांनी संपूर्ण आयुष्यात एकही विमान बनवलेलं नाही. एचएएल इतकी वर्ष विमान निर्मिती करत आहे…पण त्यांच्याकडून काढून घेत अनिल अंबानींना करार देण्यात आला. 30 हजार कोटी त्यांच्या खिशात घालण्यात आले. अनिल अंबानी यांच्यावर 33 हजार कोटींचं कर्ज आहे असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.
10 दिवस आधी अनिल अंबानी यांनी कंपनी उभी केली होती. 10 दिवसांनी त्यांना करार मिळाला. नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले तेव्हा अनिल अंबानीदेखील त्यांच्यासोबत होते. मनोहर पर्रीकर मला काही माहिती नाही सांगतात. करार कसा बददला हे मला माहित नाही असे पर्रीकरांचे शब्द आहेत. नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना करार का दिला हे जाहीर करावं अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
गांधीजी जोडा म्हणाले, पण मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचं आहे. मी पंतप्रधान होण्याआधी देश झोपला होता असं म्हणत त्यांनी देशवासियांचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदी जातीपातीत भांडण लावायचं आहे. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करायचं आहे. जिथे जातात तिथे नकारात्मकता, हिंसा पसरवतात असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी शेतकरी, तरुणांना खोटी आश्वासनं दिली. खात्यात 15 लाख जमा करणार होते, 2 कोटी रोजगार निर्मिती करणार होते. पिकांना योग्य किंमत देईन असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र त्याचं काहीच झालं नाही असंही ते म्हणालेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002