व्हीएस न्युज - देशातील बहुसंख्यांक लोक रामाची पूजा करत असल्या कारणाने विरोधी पक्षदेखील अयोध्येतील राम मंदिराला विरोध करु शकत नाहीत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. सोमवारी पतंजली योगपीठतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राम मंदिर बांधण्यास आम्ही बांधील आहोत, मात्र त्यासाठी वेळ लागेल असंही ते बोलले आहेत.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी बांधील आहे. मात्र काही गोष्टींना वेळ लागतो’, असं मोहन भागवत बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘प्रत्येक सरकारला काही मर्यादा असतात, आणि त्यामध्ये राहूनच त्यांना काम करावं लागतं. मात्र साधू, संतांना अशा मर्यादा नसतात. त्यांनी धर्म, देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी काम केलं पाहिजे’.
‘विरोधी पक्षही उघडपणे अयोध्येतील राम मंदिराला विरोध करु शकत नाहीत. कारण देशातील जास्तीत जास्त लोक रामाची पूजा करतात याची त्यांना कल्पना आहे. पण काही गोष्टींना वेळ लागतो’, असं मोहन भागवत बोलले आहेत. ‘प्रत्येक सरकारला काही मर्यादा असतात, पण चांगलं काम करणारं सरकार सत्तेत राहिलं पाहिजे. सत्तेवर कोण राहणार हे महत्त्वाचं असतं’, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002