व्हीएस न्युज - चाकणच्या नाणेकरवाडी मध्ये बायको घर सोडून गेल्याने पोटच्या आठ महिन्याच्या मुलाला वडिलांनी पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल सुनार असे ८ महिन्याच्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी वडील चक्र उर्फ राजू सुरत सुनार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी चक्र उर्फ राजुचे पत्नी निर्मला सोबत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पत्नी निर्मला घर सोडून निघून गेली.त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी प्रवीण बब्रुवान झुंजार यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपी वडील चक्र उर्फ राजू सुरत सुनार (वय २४, रा. ज्योतिबा नगर, नाणेकर वाडी, मूळ रा. नेपाळ) आणि पत्नी निर्मला दोन मुलांसह गुरुवारी भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते.दोन वर्षांची मुलगी आणि आठ महिन्याचा साहिल अस त्यांच कुटुंब,गुरुवारी रात्री उशिरा पत्नी निर्मला आणि आरोपी चक्र उर्फ राजू यांच्यात जोरात भांडण झाले.दोन्ही मुलांना घरी सोडून पत्नी निर्मला घराबाहेर निघून गेली.याचाच राग मनात धरून पती चक्र उर्फ राजू सुरत सुनार याने आपल्या आठ महिन्याच्या चिमुकल्याला बाथरूम जवळील पाण्याच्या टाकीत टाकून दिले यात त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार आदी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेटी देऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पत्नी निर्मला ही या अगोदर अनेक वेळा घर सोडून निघून गेलेली आहे.परंतु या दोघांच्या भांडणात आठ महिन्याच्या चिमुकलीचा जीव गमवावा लागला तर दोन वर्षीय मुलीला पोलिसांना सांभाळण्याची वेळ आहे.दरम्यान निर्मलाचा शोध पोलीस घेत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002