व्हीएस न्युज - वाकड येथील चौधरी पार्क येथे स्वराज्य रक्षक छञपती संभाजी राजे प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या नामफलकाचे रिबीन कापून आणि श्रीफळ फोडून नगरसेवक मयुर कलाटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बुधवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या उद्घाटन प्रसंगी बश्वराज रेडडी ,संदिप माने, शेळके, भरगुडे,रामभाऊ , सैंदाणे ,शेडगे , आदि मान्यवर उपस्थित होते. यायावे मोठ्याप्रमाणात महिला, पुरूष आणि तरुण मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजीक कार्यक्रते बि. जी. सुर्यवंशी व प्रेरणा शाळेचे शिक्षक पुरूषोतम पाटील ,प्रकाश कांबळे यांनी केले.
या प्रसंगी प्रतिष्ठानचा मुळ उद्धेश बि.जी.सुर्यवंशी यांनी सांगितला ते म्हणाले कि,"छत्रपती शिवाजी राजे , छत्रपती संभाजी राजे, लोकराजे शाहुमहाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले ,भारतीय राज्यघटनेचे निर्माते डाँ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा खरा इतिहास भारतीय जनतेसोर मांडणे आणि येणा-या पिढीमध्ये महामानवांचे देशभक्तीपर विचार रुजावेत आणि जाती धर्माच्या पलिकडे जावुन राष्ट्रभक्ती वाढावी, ज्यामुळे भारतीय जनतेत प्रेम व एकोपा राहील व देश प्रगतीपथावर जाईल या उद्धेशाने या प्रतिषठानची स्थापना करण्यात आली आहे."
कार्यक्रमाच्या आयोजकांना शुभेच्छा देत व आभार व्यक्त करत मयुर कलाटे म्हणाले कि" डाँ आबेडकरांनी जगातील सर्वोत्क्रुष्ट लोकशाही लिहुन देशावर फार मोठे उपकार केले आहेत.तेव्हा मुलानी महापुरूषांचे विचार आत्मसात करावे." "जगावे शिवबांसारखे आणि मरावे तर संभाजीराज्यांन सारखे" असेही यावेळी ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002