व्हिएस न्युज - चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून आगरी समाजाच्या भावना दुखावल्यानंतर भाऊ कदम यांनी सबंध आगरी समाजाची माफी मागितली आहे. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती.आगरी समाजाच्या शिष्टमंडळाने भाऊ कदम यांची भेट घेतली, तेव्हा भाऊ कदम यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला.तसेच कार्यक्रम यादीतून हे दोन एपिसोड वगळण्यात आल्याची माहितीही भाऊने दिली आहे.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात आगरी समाजाच्या बांधवाच्या भावना दुखावणारे संवाद करण्यात आले होते. यावर आगरी समाजाच्यावतीने आक्षेप नोंदविण्यात आला होता. आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, आगरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सात दिवसांत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा या संघटनेने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना दिला आहे.
तसेच, झी वाहिनीचे कोणतेच चित्रीकरण होऊ देणार नसल्याचा पवित्रा आगरी समाजाने घेतला होता, यानंतर, चला हवा येऊ द्या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत असलेल्या भाऊ कदम याने माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचेही भाऊने यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच, ५ व ६ नोव्हेंबर रोजीचा कार्यक्रम यादीतून वगळण्यात आला असल्याची माहिती भाऊनी यावेळी देत वादावर पडदा टाकला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002