व्हिएस न्युज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना सोबतच गरजूंना रक्ताची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे मानवधर्म व सेवेचे व्रत म्हणून ' एक पाऊल पुढे येऊया ,रक्तदान करूया ' हि संकल्पना राबवत आज महाराष्ट्र दिनानिमित्त विश्रांतवाडी येथे नवजीवन तरुण मंडळ आणि मुकुंद माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले . राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेच्या मान्यतेने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत आणि स्वच्छता पाळत रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला. रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले व संकलित केलेले रक्त ससून रुगणालयात देण्यात आले .
महाराष्ट्र राज्य प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आणि कुंदन लष्करे, संतोष पवार, अमोल मोहिते, मनोज साळुंके, अक्षय माने, चेतन धोत्रे यांच्यासह नवजीवन तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्यने शिबीर यशस्वी पार पडले . राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्यातर्फे सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यात दररोज साधारण पाच हजार रुगणांना रक्ताची आवश्यकता असते . विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रुगणांना रक्ताची गरज असते . नियमित राबवण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांना कोरोनाचा फटका बसला आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या पध्दतीने प्रशासनाबरोबरच गरजूंना सहकार्य करत आहेत. एखादा वेगळा उपक्रम घेण्याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी सूचना केली होती. त्यानुसार “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” असून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे कुंदन लष्करे यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002